सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप


वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील मारले गेले आहेत. दहशतवाद्यांना मारण्यासाठी तुम्हाला फोन करून विचारायचे का? त्यांना पळून जाण्याची संधी द्यायची का?, अशा थेट आणि बोचऱ्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाराणसी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत २,१८३ कोटी रुपयांच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या प्रकल्पांमध्ये रस्ते बांधकाम आणि रुंदीकरण, रुग्णालयांचे आधुनिकीकरण, शैक्षणिक संस्थांमध्ये सुधारणा, धार्मिक पर्यटनासाठी पक्क्या घाटांचे बांधकाम, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज आणि पार्किंग सुविधांचा विस्तार, तलावांचे नूतनीकरण, ग्रंथालये आणि प्राणी रुग्णालयांची स्थापना अशा कामांचा समावेश आहे.


पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधितही केले. मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.


पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना ठार मारण्याच्या वेळेवरून अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पंतप्रधान मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरनंतर मी प्रथमच वाराणसीला आलो आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मी बाबा विश्वनाथ यांच्याकडे केली होती.


त्यावेळी मी हल्ल्याचा बदला घेण्याचे वचन दिले होते. ते वचन मी पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे काशी विश्वेश्वराला समर्पित असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या