शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, 'या' मुद्यावर झाली सविस्तर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या एका मुद्यावर सविस्तर चर्चा झाली असे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. यवतमध्ये झालेल्या हिंसेबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांनी फोनवर चर्चा केल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले.

पुण्यातील यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीने स्टेटसला एक संदेश ठेवला होता. या स्टेटसवरुन गावात शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी हिंसा झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. आता यवतमध्ये संचारबंदी लागू आहे. विना परवानगी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. याआधी चार दिवसांपूर्वी यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला अटक केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. पण शुक्रवारी स्टेटसवरुन हिंसा झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

शरद पवारांनी यवत मधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी फोनवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेचे तपशील अद्याप समजलेले नाहीत. विशेष म्हणजे पवारांनी फोन करण्याच्या आधीच शरद पवार आणि रोहिणी खडसे यांचीही सविस्तर चर्चा झाली होती. पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात शरद पवार समर्थक रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक झाली. कोर्टाने प्रांजलची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. रोहिणी खडसे आणि शरद पवार भेटीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्याशी फोनवर चर्चा केली.

 
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचालींना वेग; लवकरच अध्यक्षपदाचा तिढा सुटणार

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

BMC Mayor Election 2026: मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिंदे गटाकडून 'या' दोन महिलांच्या नावाची चर्चा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरपदाबाबतची उत्सुकात शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग