Pune Accident: पुण्यात खड्ड्याने घेतला वृद्धाचा जीव, यंत्रणेचा निष्काळजीपणा की हेल्मेटचा अभाव?

पुणे:  पुण्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ते स्कूटरवरून जात असताना त्यांची स्कूटर खड्ड्यात घसरली आणि ते तेथून जाणाऱ्या चारचाकी वाहनाच्या खाली आले. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ जवळच्या हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा खड्डा रस्ते बांधणाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचंद सांगितले जात आहे, कारण त्यांनी पदपथ आणि सिमेंट रस्त्यामध्ये अंतर सोडले होते. आणि त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्याने जीव घेतला.


पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ६१) असं मृत व्यक्तीचे नाव होते. रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्यामध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून त्यांची दुचाकी घसरली. यामुळे त्यांचा तोल गेला. मात्र तेवढ्यात मागून आलेल्या कारच्या खाली ते चिरडले गेले. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये सदर व्यक्तीने हेलमेट घातली नसल्याचे देखील निदर्शनास आलं आहे. त्यामुळे हेलमेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, असे सूर देखील उमटत आहे. मात्र, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे जाणारे अनेक जीव आजही मोठी समस्या आहे.


त्यामुळे या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर थेट सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली