Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

  79

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार


Rani Mukherji Reaction on First national Award: राणी मुखर्जीला तिच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. या खास प्रसंगी, राणी मुखर्जीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राणी म्हणते की तिच्या ३० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीची मेहनत फळाला आली. हा सन्मान मिळाल्याने ती खूप आनंदी आहे.



'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जीने व्यक्त केला आनंद


७१ वा राष्ट्रीय पुरस्कार: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची अधिकृत यादी काल १ ऑगस्ट रोही जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अनेक कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ज्यात अशीही काही नावे आहेत, जी आश्चर्यचकित करणारी होती. मात्र, त्यापैकी एक नाव असे होते जे सोशल मीडियावर पाहून सर्वांना आनंद झाला. अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे.


राणी गेल्या ३० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावत आहे. तिला अनेक पुरस्कार मिळाले, मात्र राष्ट्रीय पुरस्काराने तिला नेहमीच हुलकावणी दिली. मात्र, आता इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणानंतर, तिला तिच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ज्याबद्दल ती खूप आनंदी आहे. राणीने त्याबद्दल आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे,



राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जीची प्रतिक्रिया


ती म्हणते, 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटातील माझ्या अभिनयासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, ज्यामुळे मी खूप आनंदी आणि तितकीच भावनिक झाले आहे. योगायोगाने, माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीतील हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. एक अभिनेत्री म्हणून, मला अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि प्रेक्षकांनी देखील माझ्यावर भरभरून प्रेम केले. 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटातील माझ्या कामाचा सन्मान केल्याबद्दल मी राष्ट्रीय पुरस्कार ज्युरींचे आभार मानते. मी हा आनंद चित्रपटाच्या संपूर्ण टीमला, माझे निर्माते निखिल अडवाणी, मोनिषा आणि मधू, माझे दिग्दर्शक असीमा छिब्बर आणि आईची ताकद दाखवणाऱ्या या विशेष प्रकल्पात काम करणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. माझ्यासाठी, हा पुरस्कार माझ्या ३० वर्षांच्या कामाची, माझ्या कठोर परिश्रमाची आणि चित्रपट उद्योगावरील माझ्या प्रेमाची एक ओळख आहे.'



पुरस्कार जगातील सर्वोत्कृष्ट मातांना समर्पित


'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार तिच्यासाठी खूप खास का आहे हे राणीने पुढे स्पष्ट केले. ती म्हणाली, 'मी माझा राष्ट्रीय पुरस्कार जगातील सर्वोत्कृष्ट सर्व मातांना समर्पित करते. आईचे प्रेम आणि तिच्या मुलांना वाचवण्यासाठी तिची पराकाष्ठा खूप मोठी असते. या चित्रपटात, एका भारतीय आईने तिच्या मुलांसाठी संपूर्ण देशाशी लढा दिला, ही कहाणी मला खूप भावली.'



'मर्दानी ३' द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला


राणी मुखर्जी लवकरच तिचा हिट चित्रपट फ्रँचायझी 'मर्दानी' च्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. तिचा 'मर्दानी ३' हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, ती शाहरुख खानसोबत 'किंग' या चित्रपटातही काम करत आहे, जो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण काही काळापूर्वीच सुरू झाले आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट

येसूबाईने गुपचप उरकला साखरपुडा !

मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली