Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यात सुरू झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अखल जिल्ह्यातील जंगली भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. ही चकमक शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झाली. जम्मू-काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे या भागात शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांकडून कारवाई करण्यात आली.





रात्रीभर सुरू राहिलेला गोळीबार


भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सोशल मीडियावर म्हंटले, “रात्रीभर अधूनमधून आणि तीव्र गोळीबार सुरू होता. सतर्क जवानांनी काळजीपूर्वक प्रत्युत्तर देत भागात घेराव घट्ट करत ठेवला आणि संपर्क कायम ठेवत एका दहशतवाद्याला ठार मारले.”







दहशतवाद्यांची संख्येची शक्यता


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात ४ ते ५ दहशतवादी लपलेले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यामुळे अद्याप शोधमोहीम पूर्णतः थांबलेली नाही. अधिक दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा दलांकडून संपूर्ण परिसरात शोध सुरू आहे.



आठवड्यातील दुसरी मोठी चकमक



यापूर्वी ३० जुलै रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला होता. लष्कराच्या जवानांनी दोन सशस्त्र दहशतवाद्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकमकीत मारले गेलेले हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेचे लष्कर-ए-तैय्यबाचे सदस्य असल्याचे मानले जात आहे. या चकमकीच्या दोन दिवस आधी, सुरक्षा दलांनी श्रीनगरमधील जंगलात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. बुधवारी करण्यात आलेले शिवशक्ती नावाचे ऑपरेशन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या योजनांना मोठा धक्का असल्याचे लष्कराने म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये सतत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहेत.
Comments
Add Comment

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी

House Aesthetic : कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लूक!

कमी बजेटमध्ये घर सजवायचंय? https://prahaar.in/2026/07/11/upvas-food-bored-of-sabudana-khichdi-during-fasting-then-definitely-try-this-delicious-and-healthy-dishes/ या सोप्या (Simple)

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेचा भूकंप; विशाखापट्टणमपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून दूर बंगालच्या उपसागरात रविवारी पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेचा सौम्य

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत