धक्कादायक! मुंबई IIT मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. IITमधील हॉस्टेल इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोहित सिन्हा (२६) असं या विद्यार्थीचे नाव आहे. रोहित आयआयटी मुंबईत मेटा सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. रोहितने नैराश्यातून आयुष्य संपवल्याचे बोललं जातंय.




काय घडलं नेमकं?


IIT मुंबईमध्ये ही घटना शुक्रवारी रात्री घडली. रोहितच्या मृत्यूने आयआयटी परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रोहित हा हॉस्टेलच्या टेरेसवरून खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वाटत असली, तरी अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी रोहितच्या मित्रांचे आणि हॉस्टेलमधील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणीद्वारे घटनेचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयआयटी प्रशासनाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, रोहितच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



प्राथमिक माहितीनुसार, रोहित सिन्हा हा विद्यार्थी IIT मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. शैक्षणिक दबावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून, पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस रोहित सिन्हाचा मोबाइल, खोलीतील कागदपत्रे आणि इतर वस्तूंची तपासणी करत आहेत. या आधीही आयआयटीमध्ये अशा प्रकारच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे बाकी असून, शिक्षणसंस्थेने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.


Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून