धक्कादायक! मुंबई IIT मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. IITमधील हॉस्टेल इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोहित सिन्हा (२६) असं या विद्यार्थीचे नाव आहे. रोहित आयआयटी मुंबईत मेटा सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. रोहितने नैराश्यातून आयुष्य संपवल्याचे बोललं जातंय.




काय घडलं नेमकं?


IIT मुंबईमध्ये ही घटना शुक्रवारी रात्री घडली. रोहितच्या मृत्यूने आयआयटी परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रोहित हा हॉस्टेलच्या टेरेसवरून खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वाटत असली, तरी अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी रोहितच्या मित्रांचे आणि हॉस्टेलमधील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणीद्वारे घटनेचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयआयटी प्रशासनाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, रोहितच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



प्राथमिक माहितीनुसार, रोहित सिन्हा हा विद्यार्थी IIT मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. शैक्षणिक दबावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून, पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस रोहित सिन्हाचा मोबाइल, खोलीतील कागदपत्रे आणि इतर वस्तूंची तपासणी करत आहेत. या आधीही आयआयटीमध्ये अशा प्रकारच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे बाकी असून, शिक्षणसंस्थेने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.


Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती