धक्कादायक! मुंबई IIT मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. IITमधील हॉस्टेल इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोहित सिन्हा (२६) असं या विद्यार्थीचे नाव आहे. रोहित आयआयटी मुंबईत मेटा सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. रोहितने नैराश्यातून आयुष्य संपवल्याचे बोललं जातंय.




काय घडलं नेमकं?


IIT मुंबईमध्ये ही घटना शुक्रवारी रात्री घडली. रोहितच्या मृत्यूने आयआयटी परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रोहित हा हॉस्टेलच्या टेरेसवरून खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वाटत असली, तरी अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी रोहितच्या मित्रांचे आणि हॉस्टेलमधील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणीद्वारे घटनेचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयआयटी प्रशासनाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, रोहितच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.



प्राथमिक माहितीनुसार, रोहित सिन्हा हा विद्यार्थी IIT मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. शैक्षणिक दबावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून, पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस रोहित सिन्हाचा मोबाइल, खोलीतील कागदपत्रे आणि इतर वस्तूंची तपासणी करत आहेत. या आधीही आयआयटीमध्ये अशा प्रकारच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे बाकी असून, शिक्षणसंस्थेने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.


Comments
Add Comment

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर