पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात शरद पवार समर्थक रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर याला अटक झाली. कोर्टाने प्रांजलची  न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली. ही भेट पक्ष संघटनेतील कामाबाबत होती, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. अधिवेशन काळात शरद पवारांसोबत काही मुद्यांवर चर्चा राहून गेली होी. याच कारणामुळे संघटनेशी संबंधित कामांसाठी मार्गदर्शन घेण्याकरिता शरद पवारांना भेटल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या.

प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि अद्याप त्याने जामिनासाठी अर्ज केलेला नाही. ही संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया आहे. यावर न्यायालयाबाहेर बोलणे योग्य होणार नाही; असे सांगत रोहिणी खडसेंनी प्रांजलबाबतच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. योग्य वेळी योग्य ठिकाणीच या विषयावर बोलेन, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

पुणे पोलीस आयुक्तालयात रोहिणी खडसे आणि प्रांजल यांची भेट झाली. रोहिणी यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली. यानंतर रोहिणी खडसेंनी शरद पवारांशीही वेळ मागून घेऊन चर्चा केली. यामुळे प्रांजल प्रकरणात पुढे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे