बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार


अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. साबरमती स्थानकापासून सुमारे १ किमी आणि अहमदाबाद स्थानकापासून सुमारे ४ किमी हे अंतर आहे. हा पूल भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक असलेल्या साबरमती नदीवर बांधण्यात येत आहे.


या हायस्पीड मार्गावर सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर मोठा पुल बांधला जात आहे. या पुलाची उंची ३६ मीटर असून म्हणजेच सुमारे अंदाजे ११८ फूट उंची इतका हा पूल उंच आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची मीटरमध्ये सुमारे १४.८ मीटर इतकी आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो एक इंजिनियरिंगचा चमत्कार ठरणार आहे.


अहमदाबाद जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उड्डाणपूल, पूल, रेल्वे मार्ग आणि मेट्रो कॉरिडॉर यांसारख्या अनेक इन्फास्ट्रक्चर मधून बांधला जात आहे. भारतीय महामार्ग काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्वाधिक उंचीच्या बांधकाम बिंदूपासून ५.५ मीटर इतके अनिवार्य उभे अंतर राखण्यासाठी, साबरमती नदीवरील पुलाचे खांब वाढीव उंचीने तयार करण्यात आले आहेत. या पुलावर एकूण आठ गोलाकार खांब असणार असून ते ६ ते ६.५ मीटर व्यासाचे बांधले जात आहेत. यापैकी चार खांब नदीच्या पात्रात, दोन खांब नदीच्या काठावर (प्रत्येक बाजूला एक) आणि दोन खांब नदीच्या काठाच्या बाहेर उभारण्यात आले. नदीच्या प्रवाहात अडथळा कमीत कमी राहावा यासाठी पुलाची रचना ठरवून करण्यात आली आहे.


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील बहुतांश नदी पूल सुमारे ४० मीटर लांबीच्या छोट्या स्पॅनवर आधारित असलेले आहेत. तरी नदीच्या पात्रातील खांबांची संख्या कमी करण्यासाठी या पुलामध्ये ५० ते ८० मीटर लांबीच्या मोठ्या स्पॅनचा वापर करण्यात आला आहे. या पुलामध्ये प्रत्येकी ७६ मीटर लांबीचे ५ स्पॅन आणि प्रत्येकी ५० मीटर लांबीच्या २ स्पॅनचा समावेश आहे. प्रत्येक स्पॅनमध्ये २३ विभाग (सेगमेंट) असून ते सर्व ऑन-साईट (स्थळावरच) बांधकामाच्या पद्धतीने कास्ट केले जात आहेत.


हा पूल बॅलन्स्ड कँटीलिव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहे, हे एक विशेष बांधकाम तंत्र असून, जे खोल पाण्यातील आणि नद्यांवरील दीर्घ अंतराच्या पुलांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे