Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई


पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया पोस्टमुळे उसळलेल्या जातीय हिंसाचार (communal violence in Pune) संदर्भात पोलिसांनी आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांविरुद्ध पाच एफआयआर दाखल केले आहेत. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांप्रकरणी १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी दुपारी एका तरुणाने सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर गावात जातीय तणाव पसरला. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी तोडफोड करायला सुरुवात केली, दरम्यान अनेक वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. घटनेदरम्यान, हल्लेखोरांनी मोटारसायकल, दोन कार, धार्मिक स्थळ आणि बेकरीचे नुकसान केले आणि आग लावली. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गावात शांतता प्रस्थापित झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा आणि लाठीचार्ज चा वापर करावा लागला.


पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, यवत पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत हिंसाचाराशी संबंधित पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी चार गुन्हे हिंसाचार, जाळपोळ आणि मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या ५०० हून अधिक लोकांविरुद्ध दाखल आहेत. त्यापैकी १०० हून अधिक जणांची ओळख पटली आहे आणि १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे."


धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्याने शेअर केलेला मजकूर दुसऱ्या राज्यातील एका घटनेवर आधारित होता.



कलम १४४ आणि एसआरपीएफ तैनात


पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल म्हणाले की, सुरुवातीच्या तपासात कोणताही पूर्वनियोजित कट रचल्याचे दिसून आले नाही.  "गावातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मोठ्या संख्येने पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) तैनात करण्यात आले आहे. बीएनएसच्या कलम १४४ आणि बीएनएसएसच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत." असे त्यांनी पुढे माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले, "गावावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे आणि सोशल मीडियावरील क्रियाकलापांवरही विशेष लक्ष दिले जात आहे."



"कठोर कारवाई केली जाईल": मुख्यमंत्री 


पुणे दौंड दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनेचा निषेध करत म्हणाले, "मध्य प्रदेशातील एका घटनेशी संबंधित एका हिंदू पुजारीबद्दल एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केली, ज्यामुळे गावात संताप निर्माण झाला. काही लोक जाणूनबुजून अशा पोस्ट करून तणाव पसरवू इच्छितात. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गावाला भेट दिली आणि पोस्ट टाकणारा तरुण नांदेडचा रहिवासी आणि रोजंदारीवर काम करणारा असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

एका बाजूला महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर

Satara Accident : नवा संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक ५० फूट दरीत कोसळून चिमुकल्यासह चौघांचा करुण अंत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कासरतळे (Kaasratale) परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची नोंद झाली आहे. येथे

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान