Dattatray Bharne : कृषीमंत्री होताच मामांचा ‘बारामती बॉम्ब’! दत्तात्रय भरणेंनी घेतला ठोस संकल्प

मुंबई : रमी खेळणे अंगलट आले असले तरी माणिकराव कोकाटे यांच्यावरील संकट खातेबदलावर निभावण्यात आलं. अजितदादांचे विश्वासू दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची अपेक्षेप्रमाणे चांगलीच लॉटरी लागली. सध्या ते राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नियुक्त झाले असून, यापूर्वी त्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. कृषी मंत्री खात्याची जबाबदारी मिळताच भरणे मामांनी पहिली प्रतिक्रिया दिली. शेतकरी कुटुंबात जन्मलेले भरणे यांचा राजकीय प्रवास खडतर आहे. यापूर्वी क्रिडामंत्री असल्यामुळे त्यांचा हा प्रवास खेळाच्या मैदानापासून आता थेट शेतापर्यंतचा असेल, ज्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी थेट जोडले गेले आहे. त्यांनी बारामतीचे नाव घेत पहिला फैसला पण जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे इंदापूरकरांच्या उत्साहाला भरते आले आहे. काय आहे तो निर्णय?





मामा भरणे यांनी मानले आभार


दत्तात्रय भरणे यांनी आज सकाळीच, एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषिखातं मिळते यासारखा आनंद कुठला असू शकतो असा आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. या सर्वांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे ते म्हणाले. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळतं, यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.



कृषी खात्याचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खाते बदल करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. आता कर्जमाफीची लवकरच घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, अजून या खात्याचा आपण पदभार स्वीकारला नाही. कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.




इंदापूर करणार बारामतीसारखं


आज कृषीमंत्र्याची जबाबदारी मिळताच दत्तात्रय भरणे यांनी पहिला संकल्प सोडला. त्यांनी त्यांचे इंदापूर विषयीचे प्रेम व्यक्त केले. त्यांचा मनोदय व्यक्त केला. “मी शेतकरी कुटुंबातील असून मला बारामतीकरांनी (अजितदादांनी) भरभरून दिलं. पवार कुटुंबाचं माझ्यावर भरभरून प्रेम राहिलं आहे. विशेषतः अजितदादांनी भरभरून दिले. आता इंदापूर बारामतीसारखं कसं होईल यासाठी प्रयत्न करणार.” असा मनोदय दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. बारामतीसारखी इंदापूरची प्रगती साधण्याचा संकल्प त्यांनी सोडला.



शेतकरी कर्जमाफी होणार का?


शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संवेदनशील आणि चर्चेचा विषय आहे. दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. भरणे यांनी आपल्या प्रारंभिक वक्तव्यात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि नाविन्यपूर्ण शेती उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे. मात्र, कर्जमाफीच्या बाबतीत अद्याप कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही.




Comments
Add Comment

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ; मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे

ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक