वन-वे व्यवस्थेत बदल घडल्याशिवाय पर्यटन क्रांती अशक्यच; ग्रामस्थांच्या नाराजीचा सूर

माथेरानमध्ये वीज, पाणी, वाहतूकही होते एकाच मार्गाने; स्थानिकांसह, पर्यटक, विद्यार्थ्यांचेही हाल


माथेरान : १८५० मध्ये माथेरान उदयास आले. नेरळ मार्गे माथेरान या एकाच मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सद्यस्थितीत इथल्या पर्यटनाला चालना मिळत नाही. याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा नेरळ मार्गे असल्याने आजवर स्थानिकांसह पर्यटकांना अनेक अडचणींचा सामोरे जाण्याची वेळ येत आहे. वीज, पाणी आणि वाहतूक व्यवस्था हे मुख्य स्त्रोत याच मार्गे आहे. त्यामुळे अनेकदा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात.


वीज पुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा नियमितपणे होत नाही तर रहदारीसाठी याच घाट रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची तारांबळ उडते. मागील काळात २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमुळे घाटरस्ता आणि मिनिट्रेनचा मार्ग वाहून गेला होता. त्यावेळी मिनिट्रेन सुद्धा जवळपास दोन वर्षे बंद करण्यात आली होती. सातत्याने विजेच्या लपंडावामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडून जात असून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.भविष्यात मोरबे धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रयत्न केल्यास पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.


पनवेल मार्गे विजेचे कनेक्शन घेतल्यास बहुतेक समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रस्तावित असणारा रोप वे प्रकल्प शासनाने हाती घेतल्यास सर्व व्यवस्था सुरळीत होऊ शकते असे ज्येष्ठ स्थानिक मंडळी बोलत आहे.


महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पनवेल-धोदाणी-माथेरान या पर्यायी रस्त्याचा कोनशीला समारंभ होऊन जवळपास साठ वर्षे उलटून गेली तरीसुद्धा माथेरानकरांच्या या प्रमुख मागणीला अद्याप यश मिळाले नाही म्हणून माथेरानकरांसाठी अन्य पर्यायी मार्ग झाल्यास येथील वैद्यकीय, शैक्षणिक परिस्थितीत व येथील पर्यटन व्यवसायात सुधारणा होऊ शकते. नागरिकांच्या दळणवळणाकरिता नेरळ-माथेरान हा एकमेव मार्ग असल्याने नागरिक पर्यटकांना शालेय विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करताना अतोनात हाल सोसावे लागत आहेत तसेच माथेरान शहराला होणारा वीज पूरवठा व पाणीपुरवठा याच मार्गांवर असल्याने यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास येथील दुरुस्तीवर अवलंबून राहावे लागते.


पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि मग तीन ते चार दिवसांसाठी बुकिंग असणारे पर्यटक पुन्हा माघारी फिरतात. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम होतो. याचा गांभीर्याने प्रशासन व राज्य सरकारने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
- चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग