श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे सेवा निवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्या रिक्त जागेवर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्य सरकारने अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक अजीज शेख यांची धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे मांची मंत्रालयातच अप्पर मुख्य सचिव महसूल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत