Ganpati Pandal : अखेर दंडाचा डोंगर उतरला! मंडपासाठी खड्ड्यांचा दंड १५ हजारांवरून थेट २ हजारांवर!

 खड्ड्यांसाठीच्या दंडात मोठी घट


मुंबई : खड्डा खोदल्यास गणपती मंडळावर १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. या निर्णयावर गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुंबईतील सार्वजनिक मंडळांचं म्हणणं प्रशासनापर्यंत मांडण्यात आलं होतं. त्यावर अखेर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. खड्ड्यांसाठीचा दंड १५ हजारावरुन पुन्हा २ हजारावर आणण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे खणल्यास यापुढे १५ हजारांचा नव्हे, फक्त २ हजारांचा दंड आकारला जाईल! राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.


यापूर्वी मंडपासाठी खड्डा खणल्यास महापालिका प्रत्येक खड्ड्यामागे दोन हजार रुपये दंड आकारत होती. मात्र १५ हजार रुपयांचा दंड हा खूपचं असून तो रद्द करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीने राज्य सरकार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली होती. तसंच मुंबईतील रस्त्यांवर हजारो खड्डे पडेल आहेत. त्यावर कंत्राटदारांना जबाबदार धरुन त्यांच्यावर किती दंड आकारला गेला आहे, असा सवाल उपस्थित करत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.



काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे ?


अखेर गणपती मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड २ हजार रुपये इतकाच राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. "गणेशोत्सवाकरिता मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खणल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी १५,००० रुपये शुल्क आकारण्यात येणार होते. आता जुन्या नियमानुसार केवळ २,००० रुपये शुल्क आकारले जाईल. मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काँक्रीटीकरण होत आहे. मंडळांनी काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सकारात्मक विचार करावा", असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनीच केला प्रवास

मुंबई : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला.

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या