ऑपरेशन सिंदूर युद्ध नव्हते तर आत्मरक्षणासाठी...अमित शहा यांचे विधान

नवी दिल्ली: राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठे विधान केले. हे केवळ युद्ध नव्हते, तर आत्मरक्षणाचे कृत्य होते, असे शाह म्हणाले.



काय म्हणाले अमित शाह?


राज्यसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, "पहलगाममध्ये धर्माच्या आधारावर ओळख पटवून ज्या नागरिकांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसेच 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांप्रतिही मी संवेदना व्यक्त करतो."


शाह यांनी पुढे सांगितले, "२२ एप्रिल रोजी ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी मी पंतप्रधानांशी बोललो होतो. तेव्हा एका नव्याने विधवा झालेल्या मुलीला मी पाहिले होते. या हत्यांचा उद्देश असा संदेश देणे होता की, काश्मीर दहशतवादमुक्त होणार नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, काश्मीर नक्कीच दहशतवादमुक्त होईल."


मागील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील दहशतवादी घटनांवर टीका करताना शाह म्हणाले की, त्यांच्या काळात झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले दहशतवादी त्यांच्या (भाजप) सरकारच्या काळात लष्करी कारवाईत मारले गेले. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला दहशतवाद्यांच्या मनोधैर्यावर केलेला हल्ला असे संबोधले.

Comments
Add Comment

Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Cbse Starts Digital Answer Sheet : उत्तरपत्रिका तपासणीत AI ची दणक्यात एंट्री! आता तुमची उत्तरं 'मशीन' वाचणार; CBSE चा नवा बदल वाचा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यंदाच्या १२वीच्या परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत एक

Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे

Iran Israel War, Tehran : तेहरानजवळील निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला, १३ जणांचा मृत्यू

तेहरान : सोमवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इस्लामशहरजवळ एका निवासी इमारतीवर

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन