ऑपरेशन सिंदूर युद्ध नव्हते तर आत्मरक्षणासाठी...अमित शहा यांचे विधान

नवी दिल्ली: राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठे विधान केले. हे केवळ युद्ध नव्हते, तर आत्मरक्षणाचे कृत्य होते, असे शाह म्हणाले.



काय म्हणाले अमित शाह?


राज्यसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, "पहलगाममध्ये धर्माच्या आधारावर ओळख पटवून ज्या नागरिकांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसेच 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांप्रतिही मी संवेदना व्यक्त करतो."


शाह यांनी पुढे सांगितले, "२२ एप्रिल रोजी ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी मी पंतप्रधानांशी बोललो होतो. तेव्हा एका नव्याने विधवा झालेल्या मुलीला मी पाहिले होते. या हत्यांचा उद्देश असा संदेश देणे होता की, काश्मीर दहशतवादमुक्त होणार नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, काश्मीर नक्कीच दहशतवादमुक्त होईल."


मागील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील दहशतवादी घटनांवर टीका करताना शाह म्हणाले की, त्यांच्या काळात झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले दहशतवादी त्यांच्या (भाजप) सरकारच्या काळात लष्करी कारवाईत मारले गेले. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला दहशतवाद्यांच्या मनोधैर्यावर केलेला हल्ला असे संबोधले.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या