ऑपरेशन सिंदूर युद्ध नव्हते तर आत्मरक्षणासाठी...अमित शहा यांचे विधान

नवी दिल्ली: राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठे विधान केले. हे केवळ युद्ध नव्हते, तर आत्मरक्षणाचे कृत्य होते, असे शाह म्हणाले.



काय म्हणाले अमित शाह?


राज्यसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, "पहलगाममध्ये धर्माच्या आधारावर ओळख पटवून ज्या नागरिकांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसेच 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांप्रतिही मी संवेदना व्यक्त करतो."


शाह यांनी पुढे सांगितले, "२२ एप्रिल रोजी ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी मी पंतप्रधानांशी बोललो होतो. तेव्हा एका नव्याने विधवा झालेल्या मुलीला मी पाहिले होते. या हत्यांचा उद्देश असा संदेश देणे होता की, काश्मीर दहशतवादमुक्त होणार नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, काश्मीर नक्कीच दहशतवादमुक्त होईल."


मागील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील दहशतवादी घटनांवर टीका करताना शाह म्हणाले की, त्यांच्या काळात झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले दहशतवादी त्यांच्या (भाजप) सरकारच्या काळात लष्करी कारवाईत मारले गेले. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला दहशतवाद्यांच्या मनोधैर्यावर केलेला हल्ला असे संबोधले.

Comments
Add Comment

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४

भारतीय कुत्र्यांचा जागतिक पराक्रम; बीएसएफच्या ‘रिया’ने ११६ परदेशी जातींना मागे टाकत सर्वोच्च सन्मान पटकावला

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाने प्रशिक्षण दिलेल्या भारतीय जातींच्या कुत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा

फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, नोव्हेंबरपासून देशभरात SIR मोहीम सुरू

नवी दिल्ली : निवडणूक आयोग नोव्हेंबरपासून देशभरात SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविणार आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात