ऑपरेशन सिंदूर युद्ध नव्हते तर आत्मरक्षणासाठी...अमित शहा यांचे विधान

नवी दिल्ली: राज्यसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठे विधान केले. हे केवळ युद्ध नव्हते, तर आत्मरक्षणाचे कृत्य होते, असे शाह म्हणाले.



काय म्हणाले अमित शाह?


राज्यसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, "पहलगाममध्ये धर्माच्या आधारावर ओळख पटवून ज्या नागरिकांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. तसेच 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांप्रतिही मी संवेदना व्यक्त करतो."


शाह यांनी पुढे सांगितले, "२२ एप्रिल रोजी ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी मी पंतप्रधानांशी बोललो होतो. तेव्हा एका नव्याने विधवा झालेल्या मुलीला मी पाहिले होते. या हत्यांचा उद्देश असा संदेश देणे होता की, काश्मीर दहशतवादमुक्त होणार नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, काश्मीर नक्कीच दहशतवादमुक्त होईल."


मागील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील दहशतवादी घटनांवर टीका करताना शाह म्हणाले की, त्यांच्या काळात झालेल्या हल्ल्यांसाठी जबाबदार असलेले दहशतवादी त्यांच्या (भाजप) सरकारच्या काळात लष्करी कारवाईत मारले गेले. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला दहशतवाद्यांच्या मनोधैर्यावर केलेला हल्ला असे संबोधले.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या