महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाला “छत्रपती महामार्ग” नामकरण करणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आज संभाजीराजे छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. रायगडाच्या दिशेने जाणाऱ्या महाड़-रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता, त्याला “छत्रपती महामार्ग” असे नाव देण्याची मागणी मांडली असता तात्काळ प्रतिसाद देत “छत्रपती महामार्ग” असे नामकरण करण्यात येणार अशी घोषणा केली.


पूर्वी छोटा व वळणावळणाचा असलेला हा रस्ता आज गडकरी यांच्या विशेष पुढाकाराने 206 कोटींच्या निधीमधून विकसित होत आहे. जवळपास ९०% काम पूर्ण झाले असून, शिवराज्याभिषेकाच्या काळात होणारी लाखोंची ऐतिहासिक गर्दी आणि नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरते आहे.


या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्प व सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना मांडली असता, गडकरी यांनी ती तत्काळ मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वाढीव निधीची तरतूद कशी करता येईल यावरही मार्गदर्शन केले.


संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्ष या नात्याने आणि लाखो शिवभक्तांच्या वतीने गडकरीचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: