महाड-रायगड राष्ट्रीय महामार्गाला “छत्रपती महामार्ग” नामकरण करणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आज संभाजीराजे छत्रपती यांनी सदिच्छा भेट घेतली. रायगडाच्या दिशेने जाणाऱ्या महाड़-रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता, त्याला “छत्रपती महामार्ग” असे नाव देण्याची मागणी मांडली असता तात्काळ प्रतिसाद देत “छत्रपती महामार्ग” असे नामकरण करण्यात येणार अशी घोषणा केली.


पूर्वी छोटा व वळणावळणाचा असलेला हा रस्ता आज गडकरी यांच्या विशेष पुढाकाराने 206 कोटींच्या निधीमधून विकसित होत आहे. जवळपास ९०% काम पूर्ण झाले असून, शिवराज्याभिषेकाच्या काळात होणारी लाखोंची ऐतिहासिक गर्दी आणि नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरते आहे.


या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास, पथदिवे, विश्रांतीस्थळे, ऐतिहासिक शिल्प व सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत, अशी संकल्पना मांडली असता, गडकरी यांनी ती तत्काळ मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वाढीव निधीची तरतूद कशी करता येईल यावरही मार्गदर्शन केले.


संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्ष या नात्याने आणि लाखो शिवभक्तांच्या वतीने गडकरीचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

दिल्ली स्फोट : दिल्ली स्फोटातील मुख्य आरोपी उमरच्या घरावर बुलडोझर! जम्मू-काश्मीर पोलिसांची धडक कारवाई

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी (सायंकाळी ७ वाजता) झालेल्या भीषण स्फोटामुळे देशात खळबळ उडाली

घटनादुरुस्तीमुळे लष्करप्रमुख असीम मुनीर पाकिस्तानात सर्वाधिक शक्तिशाली

तिन्ही सशस्त्र दलांचे संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती नवी दिल्ली  : पाकिस्तानच्या संसदेने २७ व्या

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

दहशतवाद्यांनी आखला होता ‘बाबरी’चा बदला घेण्याचा कट

६ डिसेंबरला ब्लास्ट करण्यासाठी एक-दोन नव्हे, तब्बल ३२ कारचा होणार होता वापर नवी दिल्ली : दिल्ली कार ब्लास्ट

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,