मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

  67

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेने सकाळी कामाला जाणाऱ्या लोकांचे फारसे हाल झाले नाही. रेल्वे रुळाला तडे गेल्यानं लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या लोकल काही वेळांसाठी विस्कळीत झाल्या होत्या, मात्र आता रेल्वे सेवा सुरुळीत सुरू झाल्याचे रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यानी सांगितले आहे.



कर्जत बदलापूर लोकल सेवा सुरळीत


मुंबई उपनगरीय लोकल सेवेला जीवनवाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो लोक मुंबईत ट्रेनने प्रवास करतात. मध्य रेल्वे मार्गावर बिघाड आता प्रवाशांसाठी नेहमीचाच झालाय. आज देखील अनेक मुंबईकरांना याची प्रचिती आली. वांगणी-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे कर्जत-बदलापूर दरम्यानची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांच्या ऐन कामावर जाण्याच्या वेळी ही लोकल वाहतूक ठप्प झाल्यामुळे नोकरदारांना बराच वेळ रेल्वे स्थानकांवर गाडीची वाट पाहत उभे राहावे लागले. दररोज कर्जत-बदलापूरवरुन मोठ्या संख्येने प्रवासी नोकरीसाठी मुंबईत येत असतात. त्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या लोकांची रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढत चालली होती. मात्र आता रेल्वे प्रशासने रेल्वे रूळ दुरुस्त करत लोकल सेवा सुरळीत केली आहे.



प्रवाशांची मोठी गर्दी


पहाटे ६:४० च्या सुमारास बदलापूर ते वांगणी स्टेशन दरम्यान डाऊन लाईनवर रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे डाऊन लाईन पूर्णपणे बंद झाल्याची माहिती आहे. रुळाला तडा गेल्याने कल्याण ते सीएसएमटी आणि कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या. या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरु केलं आहे.


 

 
Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर