"डोक्यावर केस नाही म्हणून चीनला देणार का?" – अमित शाहांचा नेहरुंसह काँग्रेसवर'हल्लाबोल'

काँग्रेसने इतिहासात केलेल्या चुकांमुळेच आज दहशतवादाची समस्या उग्र झाली


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल केला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “काँग्रेसने इतिहासात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच आज देशाला दहशतवादासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.”


शाह यांनी १९६२च्या भारत-चीन युद्धाचा संदर्भ देत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, नेहरूंनी अक्साई चीनचा ३८,००० चौरस किलोमीटर भूभाग चीनला दिला होता. नेहरू म्हणाले होते की, त्या भागात गवताची काडीही उगवत नाही, तर त्याचं काय करणार? त्यावर खासदार महावीर प्रसाद त्यागी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं, ‘तुमच्या डोक्यावरही केस नाहीत, मग तेही चीनला द्यायचे का?’


इतिहासातील इतर अनेक घटनांवर भाष्य करत शाह म्हणाले की, १९४८ मध्ये भारतीय लष्कर काश्मीरमध्ये आघाडीवर असतानाही नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम घोषित केला होता. “सरदार पटेल युद्ध थांबवू नका म्हणत होते, पण नेहरूंचा निर्णय वेगळा होता.”



१९६० मधील सिंधू पाणी वाटप करारावर भाष्य करताना शाह म्हणाले, “भारतीय हिताच्या विरुद्ध जाऊन ८० % पाणी पाकिस्तानला देण्यात आले. आपण भौगोलिक आणि रणनीतिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असतानाही असा निर्णय झाला.”


१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात जिंकलेला महत्त्वाचा भूभाग १९६६ च्या करारात पाकिस्तानला परत देण्यात आल्याची आठवणही त्यांनी करून दिली.


१९७१ च्या युद्धावर बोलताना शाह म्हणाले, “इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून ऐतिहासिक विजय मिळवला. ९३ हजार पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी होते, आणि १५ हजार चौरस किलोमीटर भूभाग भारताच्या ताब्यात होता. पण शिमला करारात सगळं पाकिस्तानला परत देण्यात आलं आणि पीओकेचा मुद्दा कायमचा गुंतागुंतीचा झाला.”


अमित शाह यांच्या या भाषणामुळे संसदेत काँग्रेसविरोधी वातावरण अधिक तापलं. ऐतिहासिक चुका उघड करत त्यांनी आजच्या सुरक्षाव्यवस्थेच्या प्रश्नांचे मूळ काँग्रेसच्या धोरणांमध्ये असल्याचं ठासून सांगितलं.

Comments
Add Comment

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात