Tata Shares: टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यावधीचे वाटोळे 'या' दोन शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

मोहित सोमण: गुंतवणूकदारांना केवळ टीसीएसने केलेली १२००० कर्मचाऱ्यांची नाही तर स्वतः ची गुंतवणूक घालवल्याची चिंता अधिक असल्याचे दिसून आले आहे. टाटा कंपनीच्या शेअर्समध्ये संपूर्ण एक वर्षाचा कालखंड पकडला असता मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. कंपनीच्या श्रेणीत विचार केला असता निफ्टीत ट्रेंट (Trent) व टीसीएस (Tata Consultancy Services TCS) कंपनीच्या शेअर्समध्ये थोडीथोडकी नाही तर २५% घसरण झाली आहे. मागच्या वर्षी ट्रेंटने ८०० % परतावा (Returns) दिला असला तरी निफ्टी ५० चा विचार केल्यास कंपनीच्या शेअर्स (Stocks) ३०% घसरण झाली आहे. टीसीएस देखील घसरण्यात मागे नाही. टीसीएसच्या शेअर्समध्ये २५% घसरण केली आहे.


एकेकाळी गुंतवणूकदारांची संपत्ती दर पाच वर्षांनी दुप्पट करण्याची क्षमता असलेला खरेदी-विक्री स्टॉक मानला जाणारा टीसीएस शेअर आता २००८ च्या जागतिक आर्थिक संकटानंतरचा सर्वात वाईट टप्प्यात पोहोचला आहे. जेव्हा एका वर्षात शेअरची किंमत ५ ५% घसरली होती.गेल्या पाच वर्षांत ८००% परतावा दिल्यानंतर ट्रेंट देखील २००८ नंतरचा सर्वात वाईट टप्पात पोहोचली आहे. टीसीएसची आकडेवारी संतुलित आली असूनही आयटी क्षेत्रीय प्रभावापेक्षा कंपनीच्या अंतर्गत प्रश्नांमुळे ही घसरण झाल्याचे विश्लेषक सांगतात. ट्रेंट शेअर बाबतीत कंपनीच्या संतुलित वाढीत घसरण झाल्याने तज्ञांनी खराब रेटिंग दिल्याने कंपनीकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.कालच्या सत्रातील मूल्यांकनाचा विचार केल्यास टाटा केमिकल्सनेही चांगले प्रदर्शन केले होते. महत्वाच्या घडामोडींचा विचार केल्यास नुकत्याच टेलिकॉम विभागाने (Department of Telecom DoT) टाटा कम्युनिकेशनला ८७२७ कोटींसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. स्थूल अँडजेसटेड महसूल (Gross Adjusted Revenue) संबंधित ही नोटीस २००६ ते २०२४ पर्यंत कालखंडातील कंपनीच्या ताळेबंद हिशोबासंबंधात होती. टीसीएसने परवा १२००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केल्याने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे सुतोवाच केले होते.


घसरत असलेल्या टीसीएस शेअर्समध्ये तांत्रिक दृष्टिकोनातून, ६८२.३० रुपयांवर सध्या व्यवहार करत असले तरी त्यांच्या आठ प्रमुख साध्या चालत्या सरासरी एसएमए(Simple Moving Average SMA) सातपेक्षा कमी दर्शविला जात आहे. तर ट्रेंट या टाटा समु हाच्या कंपनीचे एसएमए ७ पेक्षा कमी दर्शविला जात आहे. दोन्ही कंपनीच्या बाबतीत कमाईत घसरण सुरू असली तरी टीसीएससाठी विश्लेषकांनी आशावाद बाळगला आहे. मोतीलाल ओसवालने ३८५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीवर बाय कॉल (Buy Call) दिला असून नुवामाने ३९५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमतीवर (Target Price TP) बाय कॉल दिला आहे.


विशेषतः जेएम फायनांशियलने जेएम फायनान्शियलने कंपनीच्या शेअर्सबाबत आशावादी असल्याचे आहे, त्यांना अशी अपेक्षा आहे की एकदा आर्थिक अनिश्चितता कमी झाली की टीसीएसची वाढ सुधारेल. टीसीएस व्यवस्थापनाने पुन्हा एकदा सांगितले आहे की आर्थिक वर्ष २६ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील महसूल वाढ आर्थिक वर्ष २५ पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे आणि जर अधिक विलंब न करता मॅक्रो परिस्थिती स्थिर झाली तर तिमाही २ पहिल्या तिमाहीपेक्षा अधिक मजबूत असू शकते. आज सकाळच्या स त्रात टीसीएस शेअर दुपारपर्यंत १.११% घसरला आहे. तर ट्रेंट शेअर दुपारपर्यंत ०.४०% वाढला होता. सकाळी बाजार उघडल्यावर टीसीएस शेअर ३०६० रूपयांवर सुरू झाला होता तर ट्रेंट शेअर सकाळी उघडल्यावर ४९९४ रुपयांवर सुरू झाला होता.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

Share Market Update : शेअर बाजारात सेन्सेक्स ६३९ अंकांनी वधारला; निफ्टी ही २४,००० च्या वर झाला बंद

मुंबई : मागील आठवड्यात सलग तीन दिवस घसरण अनुभवल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा

​Mahachatur AI Chatbot : महाचतुर एआय चॅटबॉटमुळे' कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​

असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू​ -​ ​मंगलप्रभात लोढा​,कौशल्य विकास