‘प्लास्टिकमुक्त चिपळूण’ची महिलांच्या पुढाकाराने यशस्वी लढाई

१२ दिवसांत ४३७ किलो प्लास्टिक संकलन


चिपळूण : चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतलेला पुढाकार आता शहरातील महिलांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक प्रभावी ठरत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होम मिनिस्टर’ ही महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


१५ जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आजपर्यंत १७८ महिलांनी सहभाग नोंदवला असून केवळ १२ दिवसांत तब्बल ४३७ किलो प्लास्टिक संकलित करण्यात आले आहे. हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महिलांच्या या सहभागीवृत्तीमुळे शहरात स्वच्छतेची लाट उसळली असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ठोस पाऊल पडले आहे.
या स्पर्धेतील संकल्पना अतिशय अभिनव आहे. महिनाभरात किमान १५ दिवस प्लास्टिक संकलन करणाऱ्या महिलांना विशेष कूपन्स देण्यात येत असून, त्यातून लकी ड्रॉद्वारे एक भाग्यवान महिला ‘सोन्याची नथ’ जिंकेल.


याशिवाय, १५ ऑगस्टनंतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतून दुसऱ्या एका विजेत्या महिलेला ‘पैठणी’ प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारे स्वच्छतेच्या कार्यात महिला सहभागी होत असतानाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून होत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण उपक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे केले आहे.


महिलांनी घरातील प्लास्टिक गोळा केल्यानंतर फक्त एक संदेश दिला की संस्था कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन प्लास्टिक उचलतात, इतका सुटसुटीत आणि प्रभावी हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे महिलांना केवळ बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत नाही, तर त्यांना समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे समाधानही लाभते आहे. त्यांच्या


पुढाकारामुळे चिपळूण शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती होत आहे. पर्यावरणविषयक भान निर्माण होत आहे आणि समाजात सकारात्मक ऊर्जा रुजत आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याची संधी अजूनही महिलांसाठी खुली असल्याचे आवाहन चिपळूण नगर परिषद आणि आयोजक संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; अन्यथा.....

मुंबई : मुंबईतील कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरू

'कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा ऐवजी दादरचाच थांबा द्यावा'

खेड : रत्नागिरी - दादर या पॅसेंजर गाडीला मागील काही महिन्यांपासून दादर ऐवजी दिवा हाच शेवटचा थांबा देण्यात आला आहे.

‘अलबत्या गलबत्या’ टीमच्या गाडीचा अपघात; दोन जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी ‘अलबत्या गलबत्या’ नाट्यसंघाच्या गाडीला अपघात झाला.