‘प्लास्टिकमुक्त चिपळूण’ची महिलांच्या पुढाकाराने यशस्वी लढाई

  44

१२ दिवसांत ४३७ किलो प्लास्टिक संकलन


चिपळूण : चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतलेला पुढाकार आता शहरातील महिलांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक प्रभावी ठरत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होम मिनिस्टर’ ही महिलांसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


१५ जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आजपर्यंत १७८ महिलांनी सहभाग नोंदवला असून केवळ १२ दिवसांत तब्बल ४३७ किलो प्लास्टिक संकलित करण्यात आले आहे. हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महिलांच्या या सहभागीवृत्तीमुळे शहरात स्वच्छतेची लाट उसळली असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ठोस पाऊल पडले आहे.
या स्पर्धेतील संकल्पना अतिशय अभिनव आहे. महिनाभरात किमान १५ दिवस प्लास्टिक संकलन करणाऱ्या महिलांना विशेष कूपन्स देण्यात येत असून, त्यातून लकी ड्रॉद्वारे एक भाग्यवान महिला ‘सोन्याची नथ’ जिंकेल.


याशिवाय, १५ ऑगस्टनंतर सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतून दुसऱ्या एका विजेत्या महिलेला ‘पैठणी’ प्रदान केली जाणार आहे. अशा प्रकारे स्वच्छतेच्या कार्यात महिला सहभागी होत असतानाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्नही या उपक्रमातून होत आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण उपक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे केले आहे.


महिलांनी घरातील प्लास्टिक गोळा केल्यानंतर फक्त एक संदेश दिला की संस्था कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन प्लास्टिक उचलतात, इतका सुटसुटीत आणि प्रभावी हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे महिलांना केवळ बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत नाही, तर त्यांना समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे समाधानही लाभते आहे. त्यांच्या


पुढाकारामुळे चिपळूण शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती होत आहे. पर्यावरणविषयक भान निर्माण होत आहे आणि समाजात सकारात्मक ऊर्जा रुजत आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याची संधी अजूनही महिलांसाठी खुली असल्याचे आवाहन चिपळूण नगर परिषद आणि आयोजक संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून,

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

कोकणात जाणाऱ्यांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी गणेशोत्सवात स्पेशल मेमू सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला धावणार

रत्नागिरी : दोन अल्पवयीन मुलींचे जंगलात मृतदेह सापडले, चिपळूणमध्ये घटनेनं खळबळ

चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने