'प्रलय'चा अचूक प्रहार! – भारताच्या बॅलिस्टिक शक्तीत दमदार भर!

'प्रलय' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी


नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठं यश मिळालं असून, डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सलग दोन दिवस यशस्वी चाचणी केली आहे. २८ आणि २९ जुलै २०२५ रोजी घेतलेल्या या चाचण्या लष्कराच्या गरजेनुसार करण्यात आल्या असून, अल्प आणि मध्यम पल्ल्याच्या अचूक माऱ्याची क्षमता तपासण्यासाठी या चाचण्या केल्या गेल्या.


दोन्ही दिवस क्षेपणास्त्राने अपेक्षेप्रमाणेच निश्चित दिशेने उड्डाण करत लक्ष्य अचूक भेदलं. डीआरडीओने स्पष्ट केलं की, या चाचण्यांमध्ये सर्व निर्धारित मानके आणि उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे.



‘प्रलय’ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, जलद प्रतिसादक्षम आणि स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे कमी वेळेत डिप्लॉय होऊन, अचूकतेने आणि वेगाने शत्रूच्या लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराच्या लहान पल्ल्याच्या माऱ्याची क्षमता आणखी वाढली असून, देशाच्या रक्षणसामर्थ्यात ठोस भर पडली आहे.


‘प्रलय’च्या यशस्वी चाचणीमुळे भारताची स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील ताकद अधोरेखित झाली असून, युद्धस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता आता अधिक प्रभावी झाली आहे.

Comments
Add Comment

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा