'प्रलय'चा अचूक प्रहार! – भारताच्या बॅलिस्टिक शक्तीत दमदार भर!

'प्रलय' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी


नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठं यश मिळालं असून, डीआरडीओने स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सलग दोन दिवस यशस्वी चाचणी केली आहे. २८ आणि २९ जुलै २०२५ रोजी घेतलेल्या या चाचण्या लष्कराच्या गरजेनुसार करण्यात आल्या असून, अल्प आणि मध्यम पल्ल्याच्या अचूक माऱ्याची क्षमता तपासण्यासाठी या चाचण्या केल्या गेल्या.


दोन्ही दिवस क्षेपणास्त्राने अपेक्षेप्रमाणेच निश्चित दिशेने उड्डाण करत लक्ष्य अचूक भेदलं. डीआरडीओने स्पष्ट केलं की, या चाचण्यांमध्ये सर्व निर्धारित मानके आणि उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे.



‘प्रलय’ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, जलद प्रतिसादक्षम आणि स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे कमी वेळेत डिप्लॉय होऊन, अचूकतेने आणि वेगाने शत्रूच्या लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराच्या लहान पल्ल्याच्या माऱ्याची क्षमता आणखी वाढली असून, देशाच्या रक्षणसामर्थ्यात ठोस भर पडली आहे.


‘प्रलय’च्या यशस्वी चाचणीमुळे भारताची स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील ताकद अधोरेखित झाली असून, युद्धस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता आता अधिक प्रभावी झाली आहे.

Comments
Add Comment

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने