आठ लाख झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश

निर्धारित वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्राधिकरणासमोर आव्हान


मुंबई  :  मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पात्रता निश्चिती अधिक पारदर्शकपणे करण्यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे हे प्राधिकरणासमोर एक मोठे आव्हान आहे. आगामी पाच महिन्यांत तब्बल ८ लाख झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य प्राधिकरणाने ठेवले आहे.


आतापर्यंत मुंबईतील एकूण १३ लाख ७९ हजार ०८६ झोपड्यांपैकी केवळ ५ लाख ७५ हजार १३६ झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याचा अर्थ अजूनही ८ लाख ३ हजार ९५० झोपड्यांमधील सर्वेक्षण बाकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.


यामुळे झोपु प्राधिकरणासमोर पाच महिन्यांत उर्वरित मोठ्या संख्येने झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान आहे.या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी झोपु प्राधिकरणाने कंबर कसली आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नवीन निविदा काढण्यात आल्या आहेत जेणेकरून कामाला गती मिळेल.झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीत पारदर्शकता आणण्यासाठी २०१६ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता.


मुंबईतील २५९७ झोपडपट्ट्यांमधील १० लाख ७८ हजार ७४६ झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये प्रत्यक्ष बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मात्र, एका संस्थेच्या कामामुळे काही अडचणी आल्या होत्या. सध्या ८ लाख २२ हजार ८४३ झोपड्यांचे क्रमांकन पूर्ण झाले आहे. झोपडीधारकांचे योग्य सहकार्य मिळवण्यासाठी प्राधिकरणाने जनजागृती मोहिमेवरही भर दिला आहे. पाच महिन्यांत ८ लाख झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करणे हे निश्चितच एक मोठे आव्हान आहे, परंतु प्राधिकरण हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सर्वेक्षणातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती मिळेल आणि पात्र झोपडीधारकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर

COVID-19 : साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसीस,

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून