चिन्मयी सुमितचे प्रतिपादन: मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घेणे का आहे महत्त्वाचे!

मुंबई: सध्याच्या बदलत्या शिक्षण प्रणालीत मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी अधोरेखित केले. "संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की, पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे," असे त्या म्हणाल्या. पालकांनी बोर्ड आणि भाषेच्या बदलावर लक्ष केंद्रित न करता, मातृभाषेचे महत्त्व समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


मराठी भाषेचे भविष्य आणि इंग्रजी शिक्षणावरील विचार
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे बोलताना चिन्मयी सुमित यांनी मराठी भाषेच्या भवितव्यावरही आपले विचार मांडले. उच्चभ्रू समाजाकडून मराठी भाषेला टिकवून ठेवण्याची आशा कमी असली तरी, मध्यमवर्गीय लोक मराठी भाषा जपतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, इंग्रजी बोलता येण्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिक्षण घेणे गरजेचे नाही, तर मराठी माध्यमात शिकूनही उत्तम इंग्रजी बोलता येते, असेही त्यांनी नमूद केले.


मान्यवरांचे सत्कार आणि मंडळाची प्रशंसा
या कार्यक्रमात चिन्मयी सुमित यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार आपला नसून, संस्थेच्या कामाचा गौरव आहे, असे नम्रपणे त्यांनी सांगितले. सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची प्रशंसा केली. "या संस्थेने मला घडवले आहे आणि मंडळ हे एक विद्यापीठच आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. संस्थेचे काम वाढत असून, एक 'उत्कर्ष भवन' उभारले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इंडोको रेमिडीजच्या व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे पाणंदीकर यांनी आजच्या काळात शिक्षणापेक्षा सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.


प्रकाशन सोहळा आणि गुणवंतांचा सन्मान
कार्यक्रमादरम्यान, विविध प्रकाशन सोहळे पार पडले. कार्यक्रम अध्यक्ष अदिती कारे पाणंदीकर यांच्या हस्ते 'शारदास्मृती' या जाहिरात अंकाचे प्रकाशन झाले. चिन्मयी सुमित यांनी 'प्रणामहस्तलिखिता'चे प्रकाशन केले, तर अच्युत पालव यांच्या हस्ते 'विवेकानंद स्मृती' या जाहिरात अंकाच्या दरपत्रकांचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शालांत परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेल्या हितेश जाधव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळप्रमुख विकास शिंदे यांनी केले, तर उपमंडळ प्रमुख नरेश विचारे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सहमंडळ प्रमुख सुधीर फके यांनी आभार प्रदर्शन केले, तर शिक्षणप्रमुख संकेत शिर्के आणि वेद गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments
Add Comment

वेब सीरिज विश्वातील २०२५ चा नवा चेहरा, लक्षवेधी ठरलेला 'जयदीप'!

भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील

भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार