राज्यात २५ हजार प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळा मधील तब्बल २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्य शासनाने शाळांमधील संच मान्यता करण्यासाठी सुधारित शासन निर्णय १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला होता त्याचा हा परिणाम असल्यास सांगण्यात येत आहे.


छत्रपती संभाजीनगर आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.



पूर्वीच्या संच मान्यतेनुसार, २० पटसंखेच्या शाळेत एकच शिक्षक आणि एक सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याची तरतूद होती. तसेच पूर्वी पहिली ते पाचवीच्या वर्गात ६१ विद्यार्थी असतील तर तीन शिक्षकांची तरतूद होती. मात्र, नव्या नियमात हा आकडा ७६ वर्गाला आहे. याच वेळी चौथा शिक्षक पूर्वी ९१ पट संख्येला देण्यात येत होता. आता १०६ वर पोहोचला आहे. नव्या नियमांनुसार, आता ७६ विद्यार्थ्यांना तीन शिक्षक आणि ९१ ऐवजी १०६ विद्यार्थ्यांना चौथा शिक्षक दिला जाणार आहे.या बदलांमुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरतील, असे ढाकणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना

Navneet Rana : 'शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं,'; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल

अमरावती : अमरावतीतील (Amravati) एका कार्यक्रमात बोलताना माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा