२२ एप्रिल ते १७ जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली नाही- एस. जयशंकर

ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सरकारने मांडली बाजू


नवी दिल्ली : पाकिस्ताकडून युद्ध बंदीचा प्रस्ताव आल्यामुळे ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले.


लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली. या दरम्यान, प्रथम संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाला या ऑपरेशनबद्दल सांगितले, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पाकिस्तानचा धागा उलगडला.परराष्ट्र मंत्र्यांनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीपासून ते पाकिस्तानी दूतावासातील सदस्यांना पर्सन ऑफ नॉन ग्राटा घोषित करण्यापर्यंत सरकारच्या सर्व महत्त्वाच्या पावलांची यादी दिली.सदनात ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, 22 एप्रिल ते 17 जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.


दूतावासांना माहिती देण्यासोबतच, माध्यमांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की भारताला आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.


याबाबत एस.जयशंकर म्हणाले की, पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे, आम्हाला नाही. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानबद्दल माहिती दिली. आमची लाल रेषा ओलांडली गेली, त्यानंतर आम्हाला कठोर पावले उचलावी लागली. आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांपैकी फक्त पाकिस्तानसह 3 देशांनी या ऑपरेशनला विरोध केल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. एस जयशंकर म्हणाले की संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानने टीआरएफचा बचाव केला होता. गेल्या 7 मे रोजी सकाळी एक संदेश देण्यात आला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि आम्ही पाकिस्तानला कडक संदेश दिल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर