लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर दुपारी १२ पासून सुरू होणार चर्चा


नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू झाले आहे. पण विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे बरेचसे कामकाज वाया गेले. केंद्र सरकारने कामकाजाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार लोकसभेत आज म्हणजेच सोमवार २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सलग १६ तास ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या चर्चेची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह सत्ताधाऱ्यांकडून अनेक दिग्गज चर्चेत सहभागी होणार आहेत. विरोधकांचे प्रमुख नेते या चर्चेत सहभागी होतील. चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे.





जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळ नष्ट केले. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील ११ हवाई तळांवर हल्ला केला. भारताच्या या ऑपरेशन सिंदूर बाबत आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत चर्चा होणार आहे. दोन्ही सभागृहात प्रत्येकी १६ तास चर्चा होणार आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना उलटसुलट प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर सत्ताधारी ऑपरेशन सिंदूरचं यश सभागृहात सांगतील.


मी मध्यस्ती केली म्हणून भारत - पाकिस्तान दरम्यानच्या संघर्ष टळला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सातत्याने करत आहेत. हा दावा भारताने सपशेल नाकारला आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओकडून फोन आला, त्यांनी भारताला लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली आणि या विनंतीला भारताने प्रतिसाद दिला; असे भारताने सांगितले. पण विरोधक ट्रम्प यांच्या मध्यस्तीमुळेच पाकिस्तान विरुद्धची कारवाई थांबवण्यात आल्याचा आरोप करत आहेत.




Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे