लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर दुपारी १२ पासून सुरू होणार चर्चा


नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू झाले आहे. पण विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे बरेचसे कामकाज वाया गेले. केंद्र सरकारने कामकाजाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार लोकसभेत आज म्हणजेच सोमवार २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सलग १६ तास ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या चर्चेची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह सत्ताधाऱ्यांकडून अनेक दिग्गज चर्चेत सहभागी होणार आहेत. विरोधकांचे प्रमुख नेते या चर्चेत सहभागी होतील. चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे.





जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळ नष्ट केले. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील ११ हवाई तळांवर हल्ला केला. भारताच्या या ऑपरेशन सिंदूर बाबत आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत चर्चा होणार आहे. दोन्ही सभागृहात प्रत्येकी १६ तास चर्चा होणार आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना उलटसुलट प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर सत्ताधारी ऑपरेशन सिंदूरचं यश सभागृहात सांगतील.


मी मध्यस्ती केली म्हणून भारत - पाकिस्तान दरम्यानच्या संघर्ष टळला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सातत्याने करत आहेत. हा दावा भारताने सपशेल नाकारला आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओकडून फोन आला, त्यांनी भारताला लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली आणि या विनंतीला भारताने प्रतिसाद दिला; असे भारताने सांगितले. पण विरोधक ट्रम्प यांच्या मध्यस्तीमुळेच पाकिस्तान विरुद्धची कारवाई थांबवण्यात आल्याचा आरोप करत आहेत.




Comments
Add Comment

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात