लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर दुपारी १२ पासून सुरू होणार चर्चा


नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू झाले आहे. पण विरोधकांच्या गदारोळामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याचे बरेचसे कामकाज वाया गेले. केंद्र सरकारने कामकाजाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार लोकसभेत आज म्हणजेच सोमवार २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सलग १६ तास ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या चर्चेची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह सत्ताधाऱ्यांकडून अनेक दिग्गज चर्चेत सहभागी होणार आहेत. विरोधकांचे प्रमुख नेते या चर्चेत सहभागी होतील. चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपांची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे.





जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी तळ नष्ट केले. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील ११ हवाई तळांवर हल्ला केला. भारताच्या या ऑपरेशन सिंदूर बाबत आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत चर्चा होणार आहे. दोन्ही सभागृहात प्रत्येकी १६ तास चर्चा होणार आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना उलटसुलट प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर सत्ताधारी ऑपरेशन सिंदूरचं यश सभागृहात सांगतील.


मी मध्यस्ती केली म्हणून भारत - पाकिस्तान दरम्यानच्या संघर्ष टळला, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सातत्याने करत आहेत. हा दावा भारताने सपशेल नाकारला आहे. पाकिस्तानच्या डीजीएमओकडून फोन आला, त्यांनी भारताला लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली आणि या विनंतीला भारताने प्रतिसाद दिला; असे भारताने सांगितले. पण विरोधक ट्रम्प यांच्या मध्यस्तीमुळेच पाकिस्तान विरुद्धची कारवाई थांबवण्यात आल्याचा आरोप करत आहेत.




Comments
Add Comment

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी