पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार


श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे सुरक्षा पथकांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड शाह सुलेमान उर्फ हाशिम मुसा याला ठार केले. हाशिम मुसा व्यतिरिक्त अबू हमजा आणि मोहम्मद यासिर या दोन दहशतवाद्यांनाही सुरक्षा पथकाने ठार केले. श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात झालेल्या चकमकीत हाशिम मुसासह एकूण तीन दहशतवादी ठार झाले.



हाशिम मुसा हा दहशतवादी म्हणून भारतात घुसला होता. त्याच्याच नेतृत्वात दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करुन २२ एप्रिल २०२५ रोजी २६ नागरिकांची हत्या केली. धर्म विचारून नागरिकांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये एक नेपाळी नागरिक पण होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी म्हणून सक्रीय होण्याआधी हाशिम मुसा पाकिस्तानच्या सैन्यात पॅरा कमांडो होता. तो जेसीओ किंवा हवालदार या पदावर पाकिस्तानच्या सैन्यात काम करत होता. यामुळे पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या सैन्याचा हात होता, याचा मोठा पुरावाच भारताच्या हाती आला आहे.


गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे मागील काही दिवसांपासून सुरक्षा पथकाचे सदस्य पाळत ठेवून होते. अखेर पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजेच २८ जुलै २०२५ रोजी सुरक्षा पथकाने घेराव घालून हाशिम मुसाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा पथकाने तातडीने प्रत्युत्तर दिले. सुरक्षा पथकाच्या ठोस कारवाईत पहलगामचा सूत्रधार हाशिम मुसा ठार झाला.


भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. ही कारवाई केल्यामुळे देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक होत होते. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले तरी पहलगाम येथे नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रश्न अनुत्तरित होता. आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारच ठार झालेला यामुळे दहशतवादी विरोधी भारताच्या कारवाईला आणखी मोठे यश मिळाले आहे.


Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी