खैरेवाडीला रस्ता नाही : विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा चिखलातून जीवघेणा प्रवास

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथील खैरेवाडीतील आदिवासी नागरिकांना पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या वाडीला पक्का रस्ता नसल्यामुळे, शहराकडे येण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात ओहळातून व चिखलातून जीवघेणी वाट काढावी लागते.


आदिवासींच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी आणि शिक्षणाने त्यांच्या आयुष्यात क्रांती घडवण्यासाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी, त्यांची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही. कोट्यवधी रुपयांच्या विकासाचा ढिंढोरा पिटणारे लोकप्रतिनिधी आदिवासी नागरिकांच्या या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.


इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकले शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा शिक्षणासाठी हा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. रस्ता नसल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहोळातून आणि चिखलातून मार्ग काढावा लागतो. तसेच, ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र पार करावी लागतात. ही परिस्थिती इगतपुरी-त्र्यंबक तालुक्याच्या विकासाच्या दाव्यांची पोलखोल करणारी आहे. काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रातून एका आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतानाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तरीही शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अजूनही ढिम्म असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी त्यांच्या पथकासह या वाडीला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी रस्ता बनवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.


मात्र, अजूनही या वाडीला रस्ता मिळालेला नाही, त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना चिखल तुडवत पायपीट करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींनी देखील या वाडीला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे साधे कष्टही घेतलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी रस्ता मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी, काम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा येथील आदिवासी बांधवांना आहे.


देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली असली तरी, अजूनही आदिवासींना त्यांच्या मूलभूत गरजांचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. रस्त्यांअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत, तर वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे, या आदिवासींच्या नशिबी आलेले हे दुःख कधी दूर होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Nashik : मालेगावमध्ये वाद चिघळणार ? टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वादाची ठिणगी ; भाजपचा कडक इशारा

Nashik : सहा महिन्यांपूर्वी मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावण्यात आले

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी कॉलेजसमोर लावला ‘सॉरी’चा बॅनर, रोमँटिक अंदाजात माफी मागणं पडलं महागात, पुढे घडलं असं काही की...

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी नाशिकमधील एका तरुणाने चक्क कॉलेजसमोर मोठा ‘सॉरी’चा बॅनर लावल्याचा प्रकार

Nashik News : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दिलासा

Nashik News : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र

Nashik : नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप ? एकाच इमारतीत निघाले सहा संशयित रुग्ण

Nashik : शहरात पावसाळ्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असतानाच आता कावीळसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने