मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ : पाणीसाठा ९१ टक्क्यांवर

पुणे : राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या तुफान पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणांत एकूण ९१ टक्के पाणीसाठी आहे. वरसगाव धरण ९४ टक्के भरल्याने ६३८.२० क्यूसेकचा पाणी विसर्ग सुरू आहे. मुठा नदीत शनिवारी दुपारी १६७२ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला. त्यामुळे एकूण २२७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत होत आहे. हे पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तेथून दुपारी ३ वाजता १७१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या भागाला दक्षतेचा इशारा दिला आहे.


दोन दिवसांपासून पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला पाणलोट क्षेत्रात जओरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे. वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणाची साठवण क्षमता १२.५० टीएमसी असून सध्या तेथे ११.५० टीएमसी पाणी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज निर्मिती केंद्र सुरू केले असून त्यासाठी ६०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेले पानशेत धरणाचा पाणीसाठी शनिवारी ९१ टक्के झाला असून धरणात सध्या ९.२३ टीएमसी पाणीआहे. वरसगाव, पानशेत धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात येते. पूरस्थिती उद्भवू नये म्हणून यंदा पाटबंधारे विभागाकडून आधीच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तेथे ७५ टक्के पाणी आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास तसेच वरसगाव, पानशेतचा विसर्ग वाढल्यास खडकवासला मधील विसर्ग वाढेल त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या भागात दक्षतेचा इशारा दिला आहे.



सध्य स्थितीतील धरणातील पाणीसाठा
खडकवासला - ७५ टक्के
पानशेत - ९१ टक्के
वरसगाव - ९४ टक्के
टेमघर - ८५ टक्के
एकूण - ८७ टक्के

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक