मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ : पाणीसाठा ९१ टक्क्यांवर

पुणे : राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या तुफान पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. धरणांत एकूण ९१ टक्के पाणीसाठी आहे. वरसगाव धरण ९४ टक्के भरल्याने ६३८.२० क्यूसेकचा पाणी विसर्ग सुरू आहे. मुठा नदीत शनिवारी दुपारी १६७२ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला. त्यामुळे एकूण २२७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत होत आहे. हे पाणी खडकवासला धरणात येत असल्याने तेथून दुपारी ३ वाजता १७१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या भागाला दक्षतेचा इशारा दिला आहे.


दोन दिवसांपासून पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला पाणलोट क्षेत्रात जओरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे. वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणाची साठवण क्षमता १२.५० टीएमसी असून सध्या तेथे ११.५० टीएमसी पाणी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज निर्मिती केंद्र सुरू केले असून त्यासाठी ६०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेले पानशेत धरणाचा पाणीसाठी शनिवारी ९१ टक्के झाला असून धरणात सध्या ९.२३ टीएमसी पाणीआहे. वरसगाव, पानशेत धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात येते. पूरस्थिती उद्भवू नये म्हणून यंदा पाटबंधारे विभागाकडून आधीच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तेथे ७५ टक्के पाणी आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास तसेच वरसगाव, पानशेतचा विसर्ग वाढल्यास खडकवासला मधील विसर्ग वाढेल त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या भागात दक्षतेचा इशारा दिला आहे.



सध्य स्थितीतील धरणातील पाणीसाठा
खडकवासला - ७५ टक्के
पानशेत - ९१ टक्के
वरसगाव - ९४ टक्के
टेमघर - ८५ टक्के
एकूण - ८७ टक्के

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू