मातोश्री बंगल्यावर उद्धव - राज भेट, पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा


मुंबई : शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्री बंगल्यावर आले. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मातोश्री बंगल्यावर उद्धव आणि राज एका फोटोफ्रेममध्ये दिसले. या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधू युती करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.


सध्या मनसेचे शून्य आमदार आणि शून्य खासदार आहेत. शिउबाठाचे मर्यादीत खासदार आणि आमदार आहेत. पण विरोधी गटात असल्यामुळे अनेक मुद्यांवर टीका टिप्पणी करणे एवढेच शिउबाठाच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव आणि राज यांनी केली तर विरोधी गटाची ताकद वाढेल, असे काही जणांना वाटत आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंना सत्तेची सूत्र स्वतःच्या हाती हवी असल्यामुळे युती होणे कठीण आहे, असे मत अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.



शिउबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद महाराष्ट्रात ठराविक भागांमध्येच आहे. यातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ही अशी शहरे आहेत जिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांची राजकीय जागा बळकावू इच्छित आहेत. उद्धव आणि राज या दोघांनाही आदेश देणे आवडते. यातूनच काही वर्षांपूर्वी राजकीय संघर्ष झाला होता. एकत्र आल्यास हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा झाली तरी निवडणुकीसाठी अशी युती होणे कठीण वाटते, असे मत अनेक अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.




Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान