मातोश्री बंगल्यावर उद्धव - राज भेट, पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा


मुंबई : शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्री बंगल्यावर आले. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा मातोश्री बंगल्यावर उद्धव आणि राज एका फोटोफ्रेममध्ये दिसले. या निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधू युती करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.


सध्या मनसेचे शून्य आमदार आणि शून्य खासदार आहेत. शिउबाठाचे मर्यादीत खासदार आणि आमदार आहेत. पण विरोधी गटात असल्यामुळे अनेक मुद्यांवर टीका टिप्पणी करणे एवढेच शिउबाठाच्या हाती आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव आणि राज यांनी केली तर विरोधी गटाची ताकद वाढेल, असे काही जणांना वाटत आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंना सत्तेची सूत्र स्वतःच्या हाती हवी असल्यामुळे युती होणे कठीण आहे, असे मत अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.



शिउबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांची ताकद महाराष्ट्रात ठराविक भागांमध्येच आहे. यातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर ही अशी शहरे आहेत जिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांची राजकीय जागा बळकावू इच्छित आहेत. उद्धव आणि राज या दोघांनाही आदेश देणे आवडते. यातूनच काही वर्षांपूर्वी राजकीय संघर्ष झाला होता. एकत्र आल्यास हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा झाली तरी निवडणुकीसाठी अशी युती होणे कठीण वाटते, असे मत अनेक अनेक राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.




Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील