एसटी महामंडळाकडून कोकणवासी प्रवाशांची अडवणूक सुरूच

मुंबई (प्रतिनिधी) :एकीकडे गणपती उत्सव जवळ येत असताना गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाच्या बसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे विघ्न काही संपता संपल्याचे दिसत नाही. एसटी महामंडळाने अन्यायकारक लादलेल्या ३० टक्के बस भाडे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उलटू लागल्यानंतर ते बस भाडे कमी करण्याची नामुष्की एसटी महामंडळावर आली.


मात्र आता एसटी महामंडळाने दुसऱ्या दाराने प्रवाशांवर बस भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय परस्पर घेतला आहे. या बस भाडेवाढीनुसार मुंबई ठाण्याहून कोकणात गेलेल्या बस गाडीचे तेथील नजीकच्या आगारापर्यंतचे परतीचे भाडे आता एसटी महामंडळ प्रवाशांकडून वसूल करणार आहे. त्यामुळे एका दाराने बंद केलेली बस भाडेवाढ मागील दाराने लादली गेली असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्पात येत आहे


याबाबत गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण म्हणाले कि हो भाडेवाढ अन्यायकारक असून प्रवाशांना दुप्पट भुर्दंड देणारी आहे यापूर्वी अशी छुपी भाडेवाढ करण्यात आली नव्हती.


मुंबई, ठाणे, पालघर परिसरातून कोकणात गाव तालुका वाड्यांमध्ये एसटी बसचे समूह आरक्षण केले जाते. यापूर्वी फक्त तेवढेच बस भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात होते, मात्र आता एसटी बस आपल्या नियोजित ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर जवळच्या आगारापर्यंत रिकामी बस नेताना प्रत्येक प्रवाशामागे तिकीट वसुली केली जाणार आहे. एसटीतील अधिकारी वर्ग गणेशोलावात जाणाऱ्या कोकणवासीयांच्या मार्गात अडथळय ठरत असल्याचा आरोप करत आहे.


ज्या प्रमाणे संघटित होऊन आपण ३० टक्के अन्यायकारक दरवाढ रद्द केली त्याच्यामागे आपण याचा शासनदरबरी पाठपुरावा करणार असून सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहोत, मात्र यात समूह आरक्षण स्थगित करण्यात आल्यामुळे कोकणवासीय प्रवासात अस्वस्थता वाढली आहे.- दीपक यव्हाण, गणेशभका कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या