धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाल्याने माणिकराव कोकाटेंचे मंत्रीपद धोक्यात! अजित पवार काय म्हणाले?

अहिल्यानगर: वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे रमी प्रकरण राजकारणात चांगलेच तापले आहे. विरोधक त्यावरून कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असताना, इथे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून (Santosh Deshmukh Murder Case) क्लीनचीट मिळाल्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळात पुन्हा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोकाटे यांना बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना घेतले जाणार का? अशी विचारणा केली जात आहे. मात्र याबद्दल कोण निर्णय घेणार? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये प्रतिक्रिया दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राहुरी येथे अरुण तरपुरे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ते मेळाव्यानंतर अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणासाठी आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले पुतळा उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. ज्यात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत आपले स्पष्ट मत सांगितले



धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत अजित पवार यांचे स्पष्ट मत


धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक विधान करत निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलावला. तसेच वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वरील कारवायाच्या निर्णयाबाबतही मुख्यमंत्री फडणवीसच निर्णय घेतील, असे सांगून कोकाटेंवर कारवाई होणार की, अभय मिळणार याची उत्सुकता देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवली.


धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा भाजप (BJP) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होण्याच्या चर्चांचा जोर आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, "याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. मी याबाबत एवढेच बोललो आहे की, त्यांच्या संदर्भात न्यायालयीन व राज्य सरकार मार्फत चौकशी जी सुरू होती, त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मंत्रिमंडळात कोण असावे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री व महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र बसून घेऊ".

Comments
Add Comment

UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी

राज्य सरकारचे टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Kiren Rijiju: काँग्रेसच्या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ; भाजपा नेत्याकडून व्हिडीओ शेअर

मुंबई: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सभागृहातील

मुंबईच्या धर्तीवर 'ठाणे शहर विकास समिती' स्थापन करा; उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही 'ठाणे शहर