पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी कायदेशीर आणि योग्य ती कारवाई सुरू - उपमुख्यमंत्री अजित पवार

अहिल्यानगर : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस योग्य तपास करत आहेत. मात्र, कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई सापडलेत. त्या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडून चौकशी सुरू आहे. जे कोणी या पार्टीत आढळले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर आणि योग्य ती कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते अहिल्यानगर दौऱ्यावर होते. त्या दरम्यान ते माध्यमांशी बोलले.

खराडी परिसरातील रेव्ह पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक केली. यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान ठाकरे बंधू भेटीवर बोलताना ते म्हणाले की, ठाकरे कुटुंबातील हा कौटुंबिक विषय आहे. दोन भाऊ अनेक वर्षांनी एकत्र आले तर त्यात आनंदच मानायला हवा. यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार