महिलेने या कारणामुळे सोडली तब्बल इतक्या लाखांची पगाराची नोकरी...

मुंबई : कॉर्पोरेट क्षेत्रातील ताणतणाव आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. ब्रिटनमधील एका महिलेने आपल्या आरोग्यावर होणाऱ्या या परिणामांमुळे चक्क उच्च पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलं आहे. ब्रिटनमधील ५६ वर्षीय शानी हेगन यांनी आपल्या उच्च पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून दिली आहे. मानसिक शांतता आणि आरोग्याला प्राधान्य देत त्यांनी कारखान्यातील कमी पगाराची नोकरी स्वीकारली आहे.


एकेकाळी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून वर्षाला ५७ लाख रुपये (सुमारे ६६,००० डॉलर्स) कमावणाऱ्या शानी हेगन यांना कॉर्पोरेट जगतातील दोन दशकांच्या कार्यकाळानंतर तीव्र मानसिक आणि शारीरिक ताणाचा सामना करावा लागला. कामाच्या ताणामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागला. यामुळे त्यांनी आपल्या जीवनात बदल करण्याचे ठरवले.


मोठ्या पगाराची नोकरी सोडून शानी यांनी एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली आहे, जिथे त्यांना वर्षाला केवळ २७ लाख रुपये (सुमारे ३२,२५० डॉलर्स) मिळतात. पगारात मोठी कपात झाली असली तरी, शानी त्यांच्या या नवीन भूमिकेत खूप आनंदी आणि समाधानी आहेत. त्यांचे नवीन काम खाद्यपदार्थ पॅक करणे, उत्पादनांना लेबल लावणे, कम्प्युटर व्यवस्थापन आणि साफसफाई करणे असे आहे.


शानी यांच्या म्हणण्यानुसार, या बदलामुळे त्या अधिक शारीरिक दृष्ट्या सक्रिय झाल्या आहेत, त्यांचे वजन कमी झाले आहे आणि त्यांच्या मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. आता त्यांना पूर्वीच्या नोकरीमुळे येणारी 'रविवारची संध्याकाळची भीती' वाटत नाही. त्यांना त्यांच्या छंदासाठी, म्हणजेच चित्रकलेसाठी जास्तीत जास्त वेळ मिळत आहे.


शानी हेगन यांचा विश्वास आहे की कितीही पैसा असला तरी त्या पैशाने वेळ आणि आरोग्य परत मिळवता येत नाही. मानसिक थकव्यापेक्षा काटकसर करणे त्यांना अधिक पसंत आहे. सध्या त्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस अनुभवत आहेत आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल इतरांच्या मतांची त्यांना अजिबात चिंता नाही.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल