'आयएनएस पनवेल' युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक !

शिंदे गटाच्या प्रथमेश सोमण यांचा पुढाकार


पनवेल  : १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आयएनएस पनवेल या युद्धनौकेचे पनवेलमध्ये स्मारक उभारले जाणार आहे. याबाबत काल एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या विषयात पुढाकार घेऊन महापालिकेकडे तशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे. देशातील ऐतिहासिक शहरे, शिवाजी महाराजांच्या काळातील बंदरे असणाऱ्या शहरांचे नाव युद्धनौकेला देण्याच्या प्रथेतून भारतीय नौदलाने एका युद्धनौकेला आयएनएस पनवेल असे नाव दिले.


या युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात तत्कालीन ईस्ट पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशात जाऊन प्रचंड शौर्य गाजवले व या युद्धनौकेवरील युद्धांना तीन महावीर चक्र, सात वीर चक्र, पाच नौसेना मेडल्समिळाली आहेत.


देशातील युद्धांच्या इतिहासात एवढे पराक्रमी शौर्य गाजवणारी युद्धनौका आयएनएस पनवेल ही या शहराच्या नावावरून ओळखण्यात येत होती परंतु पनवेलकरांना ही गोष्ट माहीत नव्हती. जेष्ठराज गणपती देवस्थानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आलेल्या एका बड्या नौदल अधिकाऱ्याने ही गोष्ट सांगितली. या देवस्थानचे विश्वस्त असलेले पनवेलचे शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी याबाबत काहीतरी करावे यासाठी थोडा आणखी अभ्यास करून या विषयाबाबत आवश्यक ती माहिती देण्याकरता एका बैठकीचे आयोजन केले.


थेट नवी दिल्लीहून रिटायर्ड कर्नल अनुराग अवस्थी, डिफेन्स एक्स्पर्ट संदीप उन्निथन आणि पनवेलमधीलच स्थायिक असलेले नौदलाचे माजी कप्तान अमृत गोडबोले यांच्यासह प्रथमेश सोमण यांनी पनवेल महापालिकेत जाऊन आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. त्यांना आयएनएस पनवेलच्या शौर्य बद्दल माहिती दिल्यावर ही पनवेलकरांसाठी अतिशय गौरवाची बाब असून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती व्हावी व या शौर्याचे यथोचित स्मारक पनवेल मध्ये उभे करावे याबाबत एक मत झाले. यावेळी उपस्थित सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

अरे बापरे! मांडवा जेट्टीच्या नव्या पुलाचे खांब निकामी होण्याच्या मार्गावर; जेट्टी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता

लोखंडी सळ्याही आल्या बाहेर, मूलभूत सुविधांचाही अभाव अलिबाग : गेटवे-मुंबई ते मांडवा-अलिबागला जलमार्गाने