'आयएनएस पनवेल' युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक !

शिंदे गटाच्या प्रथमेश सोमण यांचा पुढाकार


पनवेल  : १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आयएनएस पनवेल या युद्धनौकेचे पनवेलमध्ये स्मारक उभारले जाणार आहे. याबाबत काल एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या विषयात पुढाकार घेऊन महापालिकेकडे तशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे. देशातील ऐतिहासिक शहरे, शिवाजी महाराजांच्या काळातील बंदरे असणाऱ्या शहरांचे नाव युद्धनौकेला देण्याच्या प्रथेतून भारतीय नौदलाने एका युद्धनौकेला आयएनएस पनवेल असे नाव दिले.


या युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात तत्कालीन ईस्ट पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशात जाऊन प्रचंड शौर्य गाजवले व या युद्धनौकेवरील युद्धांना तीन महावीर चक्र, सात वीर चक्र, पाच नौसेना मेडल्समिळाली आहेत.


देशातील युद्धांच्या इतिहासात एवढे पराक्रमी शौर्य गाजवणारी युद्धनौका आयएनएस पनवेल ही या शहराच्या नावावरून ओळखण्यात येत होती परंतु पनवेलकरांना ही गोष्ट माहीत नव्हती. जेष्ठराज गणपती देवस्थानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आलेल्या एका बड्या नौदल अधिकाऱ्याने ही गोष्ट सांगितली. या देवस्थानचे विश्वस्त असलेले पनवेलचे शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी याबाबत काहीतरी करावे यासाठी थोडा आणखी अभ्यास करून या विषयाबाबत आवश्यक ती माहिती देण्याकरता एका बैठकीचे आयोजन केले.


थेट नवी दिल्लीहून रिटायर्ड कर्नल अनुराग अवस्थी, डिफेन्स एक्स्पर्ट संदीप उन्निथन आणि पनवेलमधीलच स्थायिक असलेले नौदलाचे माजी कप्तान अमृत गोडबोले यांच्यासह प्रथमेश सोमण यांनी पनवेल महापालिकेत जाऊन आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. त्यांना आयएनएस पनवेलच्या शौर्य बद्दल माहिती दिल्यावर ही पनवेलकरांसाठी अतिशय गौरवाची बाब असून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती व्हावी व या शौर्याचे यथोचित स्मारक पनवेल मध्ये उभे करावे याबाबत एक मत झाले. यावेळी उपस्थित सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग