'आयएनएस पनवेल' युद्धनौकेच्या शौर्याचे स्मारक !

शिंदे गटाच्या प्रथमेश सोमण यांचा पुढाकार


पनवेल  : १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शौर्य गाजवणाऱ्या आयएनएस पनवेल या युद्धनौकेचे पनवेलमध्ये स्मारक उभारले जाणार आहे. याबाबत काल एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन शिवसेनेचे महानगरप्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी या विषयात पुढाकार घेऊन महापालिकेकडे तशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे. देशातील ऐतिहासिक शहरे, शिवाजी महाराजांच्या काळातील बंदरे असणाऱ्या शहरांचे नाव युद्धनौकेला देण्याच्या प्रथेतून भारतीय नौदलाने एका युद्धनौकेला आयएनएस पनवेल असे नाव दिले.


या युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात तत्कालीन ईस्ट पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशात जाऊन प्रचंड शौर्य गाजवले व या युद्धनौकेवरील युद्धांना तीन महावीर चक्र, सात वीर चक्र, पाच नौसेना मेडल्समिळाली आहेत.


देशातील युद्धांच्या इतिहासात एवढे पराक्रमी शौर्य गाजवणारी युद्धनौका आयएनएस पनवेल ही या शहराच्या नावावरून ओळखण्यात येत होती परंतु पनवेलकरांना ही गोष्ट माहीत नव्हती. जेष्ठराज गणपती देवस्थानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आलेल्या एका बड्या नौदल अधिकाऱ्याने ही गोष्ट सांगितली. या देवस्थानचे विश्वस्त असलेले पनवेलचे शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी याबाबत काहीतरी करावे यासाठी थोडा आणखी अभ्यास करून या विषयाबाबत आवश्यक ती माहिती देण्याकरता एका बैठकीचे आयोजन केले.


थेट नवी दिल्लीहून रिटायर्ड कर्नल अनुराग अवस्थी, डिफेन्स एक्स्पर्ट संदीप उन्निथन आणि पनवेलमधीलच स्थायिक असलेले नौदलाचे माजी कप्तान अमृत गोडबोले यांच्यासह प्रथमेश सोमण यांनी पनवेल महापालिकेत जाऊन आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. त्यांना आयएनएस पनवेलच्या शौर्य बद्दल माहिती दिल्यावर ही पनवेलकरांसाठी अतिशय गौरवाची बाब असून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती व्हावी व या शौर्याचे यथोचित स्मारक पनवेल मध्ये उभे करावे याबाबत एक मत झाले. यावेळी उपस्थित सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या