परळ पुलाचे मजबुतीकरण करणार

  64


मुंबई : मुंबई शहराला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या परळ टी टी उड्डाणपुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका नवे कंत्राट देणार आहे. पुलावरील दोन मार्गिकांचे काम टप्प्याटप्प्यात केले जाणार आहे. याआधी दीड वर्षांपूर्वी या पुलावर किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. परळ टी टी उड्डाणपुलाच्या मजबुतीकरणासाठी १३ कोटी ८२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी कंत्राटदाराचीही निवड झाली आहे.


वाहनचालकांना दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर, भायखळा, लालबागनंतर परळ टीटी उड्डाणपुलामार्गे, दादर टीटी, माटुंगा, सायनपासून पुढे पूर्व उपनगरांत जाता येते. यामुळे परळ टी टी उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. या उड्डाणपुलाला ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.


परळ टी टी उड्डाणपुलावर काही ठिकाणी डांबराचा स्तर खराब झाल्याने वाहनचालकांना अडथळा येत होता. अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे महापालिकेने ऑक्टोबर २०२३मध्ये पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. पण आता पुलाचे मजबुतीकरण केले जाणार आहे. पुलावरील पृष्ठभागासह अन्य भागात डांबर काढून काँक्रिटचा थर दिला जाणार आहे. पुलावर सध्या २२ प्रसरण सांधे आहेत. ते कमी करुन १० वर आणले जातील.


Comments
Add Comment

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर

मुंबई - कोकण रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू

दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा मुंबई : गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी

बाप्पाच्या स्वागताला वरुणराजाचे आगमन ! या ठिकाणी यलो अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील २४