परळ पुलाचे मजबुतीकरण करणार


मुंबई : मुंबई शहराला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या परळ टी टी उड्डाणपुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका नवे कंत्राट देणार आहे. पुलावरील दोन मार्गिकांचे काम टप्प्याटप्प्यात केले जाणार आहे. याआधी दीड वर्षांपूर्वी या पुलावर किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. परळ टी टी उड्डाणपुलाच्या मजबुतीकरणासाठी १३ कोटी ८२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी कंत्राटदाराचीही निवड झाली आहे.


वाहनचालकांना दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर, भायखळा, लालबागनंतर परळ टीटी उड्डाणपुलामार्गे, दादर टीटी, माटुंगा, सायनपासून पुढे पूर्व उपनगरांत जाता येते. यामुळे परळ टी टी उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. या उड्डाणपुलाला ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत.


परळ टी टी उड्डाणपुलावर काही ठिकाणी डांबराचा स्तर खराब झाल्याने वाहनचालकांना अडथळा येत होता. अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे महापालिकेने ऑक्टोबर २०२३मध्ये पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. पण आता पुलाचे मजबुतीकरण केले जाणार आहे. पुलावरील पृष्ठभागासह अन्य भागात डांबर काढून काँक्रिटचा थर दिला जाणार आहे. पुलावर सध्या २२ प्रसरण सांधे आहेत. ते कमी करुन १० वर आणले जातील.


Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या