Jitin Prasada: भारतातील मोबाइल फोनची निर्यात १२७% वाढली

मंत्री जितीन प्रसाद यांचे संसदेत प्रतिपादन !


प्रतिनिधी: भारतातून केवळ मोबाईल फोनची निर्यात २०१४-१५ मध्ये १५०० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये २ लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच १२७ पट वाढली असल्याचे मंत्री जितिन प्रसादा यांनी संसदेत सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पाद नासाठी पीएलआय (Production Linked Incentive PLI) योजनेद्वारे, प्रामुख्याने मोबाईल फोन उत्पादनासाठी जून २०२५ पर्यंत १.३ लाख थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती शुक्रवारी संसदेत सरकारतर्फे देण्यात आली आहे. विरोधकांनी विचार लेल्या प्रश्नाला इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितिन प्रसादा यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, या योजनेने १२३९० कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे आणि ८.४४ लाख कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन साध्य केले आहे ' असे म्हटले.'भारताने स्वतःला निव्वळ आयातदार ते निव्वळ मोबाइल फोन निर्यातदार बनवले आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश आहे. पीएलआय योजनेमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक, उत्पादन, निर्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे,' असेही प्रसादा यावेळी म्हणाले आहेत.


त्यांनी यापुढे सांगितले की या योजनेअंतर्गत देशाने ४.६५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या आहेत .प्रसाद यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 'LSEM (Large Scale Electronic Manufacturing) योजनेसाठीच्या पीएलआय योजनेने आधीच १२३९ ० कोटींची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे ८४४७५२ कोटींचे एकत्रित उत्पादन झाले आहे, तर ४,६५,८०९ कोटींची निर्यात झाली आहे आणि जून २०२५ पर्यंत १३०३३० (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत,' असे मंत्री म्हणाले उत्तर देताना म्हणाले आहेत.यापुढे निवेदनात प्रसादा म्हणाले की,'आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना २.० ने ७१७.१३ कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे जूनपर्यंत १२१९५.८४ कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन झाले आहे आणि ५ ०५६ (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत.  'गेल्या ५ वर्षांत (म्हणजेच आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून) इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात एकूण ४०७१ दशलक्ष डॉलर्सची थेट गुंतवणूक झाली आहे, ज्यामध्ये २८०२ दशलक्ष डॉलर्सची एकत्रित थेट गुंतवणूक मेइटीवाय पीएलआय लाभार्थ्यांनी केली आहे,' असे मंत्री म्ह णाले.

Comments
Add Comment

Monsoon Update : राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन, पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने अचानक ओढ दिल्याने निर्माण झालेली चिंतेची स्थिती आता

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, १२ जणांचा मृत्यू; ६ बेपत्ता, वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीने भीषण रूप धारण केले असून,

Nagaland Landslide : नागालँडमध्ये दरड कोसळून ८ जणांचा मृत्यू, १२ जखमी; बचावकार्य सुरू

मोन : नागालँडमधील मोन जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या दरड कोसळण्याच्या अनेक भीषण घटनांमध्ये किमान ८ जणांचा

Amit Shah : अमित शाहांची जम्मू आणि काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu - Kashmir) मुसळधार

Supreme Court On SIR : SIR नंतर मतदार यादीतून नाव हटलं तरी नागरिकत्व रद्द होत नाही! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेनंतर एखाद्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले गेले, तरी त्यामुळे

Google Doodle for FIFA Final 2026 : Google Doodle वर FIFA फायनलचा जल्लोष! अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अंतिम सामन्यासाठी गुगलकडून खास डुडलची रचना

नवी दिल्ली : फुटबॉल विश्वाचे लक्ष लागलेल्या FIFA World Cup 2026 च्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर Google ने आपल्या होमपेजवर