Jitin Prasada: भारतातील मोबाइल फोनची निर्यात १२७% वाढली

मंत्री जितीन प्रसाद यांचे संसदेत प्रतिपादन !


प्रतिनिधी: भारतातून केवळ मोबाईल फोनची निर्यात २०१४-१५ मध्ये १५०० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये २ लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच १२७ पट वाढली असल्याचे मंत्री जितिन प्रसादा यांनी संसदेत सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पाद नासाठी पीएलआय (Production Linked Incentive PLI) योजनेद्वारे, प्रामुख्याने मोबाईल फोन उत्पादनासाठी जून २०२५ पर्यंत १.३ लाख थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती शुक्रवारी संसदेत सरकारतर्फे देण्यात आली आहे. विरोधकांनी विचार लेल्या प्रश्नाला इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितिन प्रसादा यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, या योजनेने १२३९० कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे आणि ८.४४ लाख कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन साध्य केले आहे ' असे म्हटले.'भारताने स्वतःला निव्वळ आयातदार ते निव्वळ मोबाइल फोन निर्यातदार बनवले आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश आहे. पीएलआय योजनेमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक, उत्पादन, निर्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे,' असेही प्रसादा यावेळी म्हणाले आहेत.


त्यांनी यापुढे सांगितले की या योजनेअंतर्गत देशाने ४.६५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या आहेत .प्रसाद यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 'LSEM (Large Scale Electronic Manufacturing) योजनेसाठीच्या पीएलआय योजनेने आधीच १२३९ ० कोटींची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे ८४४७५२ कोटींचे एकत्रित उत्पादन झाले आहे, तर ४,६५,८०९ कोटींची निर्यात झाली आहे आणि जून २०२५ पर्यंत १३०३३० (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत,' असे मंत्री म्हणाले उत्तर देताना म्हणाले आहेत.यापुढे निवेदनात प्रसादा म्हणाले की,'आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना २.० ने ७१७.१३ कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे जूनपर्यंत १२१९५.८४ कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन झाले आहे आणि ५ ०५६ (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत.  'गेल्या ५ वर्षांत (म्हणजेच आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून) इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात एकूण ४०७१ दशलक्ष डॉलर्सची थेट गुंतवणूक झाली आहे, ज्यामध्ये २८०२ दशलक्ष डॉलर्सची एकत्रित थेट गुंतवणूक मेइटीवाय पीएलआय लाभार्थ्यांनी केली आहे,' असे मंत्री म्ह णाले.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन