Jitin Prasada: भारतातील मोबाइल फोनची निर्यात १२७% वाढली

मंत्री जितीन प्रसाद यांचे संसदेत प्रतिपादन !


प्रतिनिधी: भारतातून केवळ मोबाईल फोनची निर्यात २०१४-१५ मध्ये १५०० कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये २ लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच १२७ पट वाढली असल्याचे मंत्री जितिन प्रसादा यांनी संसदेत सांगितले आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पाद नासाठी पीएलआय (Production Linked Incentive PLI) योजनेद्वारे, प्रामुख्याने मोबाईल फोन उत्पादनासाठी जून २०२५ पर्यंत १.३ लाख थेट नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती शुक्रवारी संसदेत सरकारतर्फे देण्यात आली आहे. विरोधकांनी विचार लेल्या प्रश्नाला इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री जितिन प्रसादा यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, या योजनेने १२३९० कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे आणि ८.४४ लाख कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन साध्य केले आहे ' असे म्हटले.'भारताने स्वतःला निव्वळ आयातदार ते निव्वळ मोबाइल फोन निर्यातदार बनवले आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश आहे. पीएलआय योजनेमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक, उत्पादन, निर्यात आणि रोजगार निर्मितीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे,' असेही प्रसादा यावेळी म्हणाले आहेत.


त्यांनी यापुढे सांगितले की या योजनेअंतर्गत देशाने ४.६५ लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात केल्या आहेत .प्रसाद यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 'LSEM (Large Scale Electronic Manufacturing) योजनेसाठीच्या पीएलआय योजनेने आधीच १२३९ ० कोटींची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे ८४४७५२ कोटींचे एकत्रित उत्पादन झाले आहे, तर ४,६५,८०९ कोटींची निर्यात झाली आहे आणि जून २०२५ पर्यंत १३०३३० (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत,' असे मंत्री म्हणाले उत्तर देताना म्हणाले आहेत.यापुढे निवेदनात प्रसादा म्हणाले की,'आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना २.० ने ७१७.१३ कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे जूनपर्यंत १२१९५.८४ कोटी रुपयांचे एकत्रित उत्पादन झाले आहे आणि ५ ०५६ (प्रत्यक्ष नोकऱ्या) अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत.  'गेल्या ५ वर्षांत (म्हणजेच आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून) इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात एकूण ४०७१ दशलक्ष डॉलर्सची थेट गुंतवणूक झाली आहे, ज्यामध्ये २८०२ दशलक्ष डॉलर्सची एकत्रित थेट गुंतवणूक मेइटीवाय पीएलआय लाभार्थ्यांनी केली आहे,' असे मंत्री म्ह णाले.

Comments
Add Comment

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री

प्रिसिक्रिप्शन वाचता येईल अशा मोठ्या अक्षरात लिहा, डॉक्टरांना हायकोर्टाचे आदेश

चंदिगड : रुग्णाला कोणते औषध कसे घ्यावे, कोणत्या टेस्ट करुन घ्याव्या ? आदी सूचना देण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने

प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे ९१ व्या वर्षी वाराणसीत निधन

वाराणसी: प्रख्यात पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचे आज, २ ऑक्टोबर २०२५

यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस