यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आणि इंडियन स्टॅटस्टिक्स सर्व्हिसेसच्या परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. देशात इंडियन इॅकानॉमिक्स सर्व्हिसमध्ये मोहित अग्रवाल नदबईवाला हा पहिला आला आहे. तर ऊर्जा रहेजा दुसऱ्या आणि गौतम मिश्राने तिसऱ्या स्थान पटकावले आहे. दुसरीकडे इंडियन सॅटिस्टीकल सर्व्हिसचे निकाल पाहिले तर कशिस कसाना देशात पहिला आला आहे. त्यानंतर, आकाश शर्मा दुसऱ्या स्थानावर असून शुभेंदू घोष तिसरे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्रातील मयुरेश वाघमारे आठव्या स्थानी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) भारतीय आर्थिक सेवा (आयइएस) / भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. या परीक्षेचा लेखी टप्पा २० जून ते २२ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता, तर मुलाखती सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आल्या होत्या. आयोगाने निकाल जाहीर केल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जातील, अशी माहितीही दिली आहे.

या निकालामध्ये एकूण १२ उमेदवारांचे निकाल तात्पुरते ठेवण्यात आले आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेदवारांचे निकाल तात्पुरते ठेवण्यात आले आहेत, त्यांच्याकडून आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे तपासली जाऊन त्यांच्या 'तात्पुरत्या' स्थितीबद्दल स्पष्टता मिळेपर्यंत, आयोगाकडून त्यांना नोकरीची ऑफर दिली जाणार नाही. सर्व पात्र उमेदवारांनी पुढील प्रक्रिया आणि सूचनांसाठी आयोगाच्या वेबसाइटला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिष्ठित इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत सोलापूरचे मयुरेश भारत वाघमारे यांनी आठवा क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, एकूण १२ जागांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेले मयुरेश वाघमारे हे एकमेव उमेदवार आहेत. यूपीएससीकडून जून २०२५ मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील तब्बल ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

मयुरेश वाघमारे हे सध्या अलिबाग येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले भारत वाघमारे यांचे चिरंजीव आहेत. तसेच, त्यांचे आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेतील ही उज्ज्वल कौटुंबिक परंपरा मयुरेश यांनी एक पाऊल पुढे नेत आयएएस श्रेणीतील या परीक्षेत यश मिळवले. या नेत्रदीपक यशानंतर मयुरेश वाघमारे यांची निवड केंद्रीय वित्त मंत्रालयात किंवा रिझर्व्ह बँकेत उच्च पदावर होण्याची शक्यता आहे. मयुरेश वाघमारे यांनी आपले प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे पूर्ण केले. तर, बारावीचे शिक्षण संगमेश्वर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात घेतले.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा