ठरलं तर मग' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अर्जुन सुभेदारने सांगितलं नेमकं काय घडणार

  104

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला आहे. मालिकेत सुरू असलेल्या वात्सल्य आश्रमातील विलासच्या खून प्रकरणाच्या कोर्ट केसचा निकाल येत्या 30 जुलै रोजी लागणार असल्याने, ही मालिका संपणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, मालिकेतील प्रमुख कलाकारांनी व्हिडीओद्वारे या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


कोर्ट केस संपणार, पण मालिका नाही!


याबाबत खुद्द अर्जुन सुभेदार म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने स्पष्टीकरण दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अमित भानुशालीने सांगितले की, "बऱ्याच लोकांनी असे विचारले की, कोर्ट केस संपणार आहे तर मालिकाही संपतेय की काय? तर, असं अजिबात नाही आहे! मालिका संपत नाहीये, फक्त मधुभाऊंची जी केस आहे, ती संपणार."





तो पुढे म्हणाला की, "अडीच-पावणे तीन वर्ष लागली या कोर्ट केसला संपायला... पण यानंतरही बरंच काही बाकी आहे." भानुशालीने स्पष्ट केले की, खरी तन्वी कोण आहे, सायलीच खरी तन्वी आहे का आणि नागराज-महिपत यांच्या केससुद्धा आहेत. त्यामुळे अर्जुन सुभेदार पुन्हा एकदा कोर्टात वकिलाच्या वेशात दिसणार आहे. "तुमचं इतकं प्रेम आहे, इतकी माया आहे की, शो कधीच संपणार नाही," असे म्हणत त्याने प्रेक्षकांना आश्वस्त केले.


काय आहे सध्याचा 'ठरलं तर मग' मालिकेतील पेच?


'ठरलं तर मग' मालिकेमध्ये सध्या वात्सल्य आश्रमात जानेवारी 2023 मध्ये घडलेल्या विलासच्या खून प्रकरणाचा निकाल लागणार आहे. या प्रकरणात अर्जुन सुभेदार आणि दामिनी देशमुख हे दोन प्रमुख वकील आमनेसामने आहेत. साक्षी, प्रिया आणि महिपत या त्रिकुटाचा खोटेपणा उघडकीस आणून मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन अथक प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, दामिनीला कोणत्याही मार्गाने साक्षीला वाचवायचे आहे. आतापर्यंतच्या एपिसोड्स आणि प्रोमोवरून हे जवळपास निश्चित झाले आहे की, निकाल मधुभाऊंच्या बाजूने लागेल.


अर्जुनसह मालिकेतील प्रताप, चैतन्य आणि अस्मिता यांसारख्या इतर कलाकारांनीही 'ठरलं तर मग' मालिका संपणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला असून, या व्हिडिओंवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे, प्रेक्षकांना आता पुढील भागांमध्ये काय रहस्य उलगडणार याची उत्सुकता लागली आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन