Asia Cup 2025: 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान सामना, स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2025: आशिया कप २०२५च्या तारखा समोर आल्या आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी तारखांबाबत माहिती दिली आहे. अनेक वाद आणि चर्चांनंतर भारत आणि पाकिस्तान लवकरच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना २०२५ च्या आशिया कपमध्ये होणार आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळवली जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाईल, जी आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या तयारीचा भाग म्हणून निश्चित करण्यात आली आहे.



भारत-पाकिस्तान एकाच गटात


४ संघांना वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान हे संघ आहेत. गट ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आहेत.



भारताचा पहिला सामना या संघासोबत


आशिया कप २०२५ ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होईल. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध असेल. भारताचा दुसरा सामना १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध आहे. तर तिसरा सामना १९ सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध असेल.



८ संघ सहभागी


आशिया कपच्या आगामी आवृत्तीत आठ संघ सहभागी होतील. त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. स्पर्धेत आठ संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि हाँगकाँग आहेत. अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि ओमान यांना गट ब मध्ये स्थान मिळाले आहे.



राजकीय तणावामुळे भारत-बांगलादेश मालिका पुढे ढकलण्यात आली


अलीकडेच, भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक तणावाचे कारण देत बीसीसीआयने ढाका येथे झालेल्या एसीसी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने भाग घेतला. या तणावामुळे, ऑगस्ट २०२५ मध्ये प्रस्तावित भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल