Vastu Shastra: घड्याळाची ही दिशा बदलू शकते तुमचे भाग्य, मिळणार यश-संपत्ती

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घराच्या विविध दिशांचे आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतात. अनेकदा हे परिणाम सकारात्मक असतात तर काही परिणाम नकारात्मक असतात. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला घड्याळ लावणे अतिशय शुभ मानले जाते. कारण घड्याळ हे वेळेचे प्रतीक मानले जाते.


हे घड्याळ योग्य ठिकाणी लावल्याने उर्जेचे संतुलन राखण्यासाठी गरजेचे असते. घरात घड्याळ लावण्यासाठी सगळ्यात योग्य दिशा हा उत्तर अथवा पूर्व मानली जाते. उत्तर दिशेला धन आणि समृद्धीचे कारक सांगितले आहे. तर पूर्व दिशा सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असते.


जेव्हा घड्याळ तुम्ही उत्तर अथवा पूर्व दिशेला भिंतीवर लावतात तेव्हा घरात चांगल्या उर्जेचा संचार वाढतो. तसेच वेळेला अधिक महत्त्व प्राप्त होते. वास्तुशास्त्रात पश्चिम आणि दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने वेळेची गती मंदावू शकते. यामुळे कुटुंबात अनावश्यक तणाव आणि त्रास होऊ शकतो.


याशिवाय घड्याळ नेहमी स्वच्छ आणि योग्य वेळ दाखवणारे असावे. तुटलेले-फुटलेले अथवा योग्य वेळ न दाखवणारे घड्याळ नेहमी नकारात्मक उर्जेचे प्रतीक ठरू शकते. घड्याळ हे नेहमी भिंतीवर नजरेच्या समोर अथवा थोड्या उंचीवर लावले पाहिजे.

Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे