मनसे कार्यकर्ते आक्रमक : हॉटेल मालकांना मराठी पाट्या लावण्याची समज

तलासरी : मुंबई-अहमदाबाद महामार्गांवर अनेक गुजराती मारवाडी लोकांचे हॉटेल असून या हॉटेलच्या मालकांनी आपल्या हॉटेल वरील पाट्या या गुजराती भाषेत लावल्या आहेत. त्या पाट्या पाहून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठी भाषेचा अवमान होत असल्याचा आरोप करत त्यांनी या पाट्यांची तोडफोड केली. या हॉटेल चालकांनी आपल्या हॉटेलच्या पाट्या मराठीत लावाव्यात असा इशारा दिला गेला. दरम्यान शांतता व एकोपा राहण्यासाठी शुक्रवारी सकाळी या हॉटेल चालकांना तसेच मनसे कार्यकर्त्यांना तलासरी पोलीस स्टेशनला बोलावून सामंजस्य घडवून आणले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सदर बैठकीमध्ये मनसे पदाधिकारी यांनी गुजराती पाट्या असलेले हॉटेल यांनी सात दिवसांमध्ये मराठी पाट्या लावण्यात यावे, तसेच मेनू कार्ड मराठी मध्ये ठेवावेत, हॉटेलमध्ये काम करणारे कामगार यांनी मराठीत बोलले पाहिजे याबाबत सांगितले. यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी हॉटेल मालक व चालक यांना मराठी पाटी, मराठी भाषा, मेनू कार्ड, याबाबत सूचना दिल्या तसेच मनसे पदाधिकारी यांना कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे सांगितले.

Comments
Add Comment

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता