एलओसीवर भूसुरूंग स्फोटात अग्निवीर हुतात्मा, दोघे जखमी

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आज, शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय सैन्यातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर २ जवान जखमी झाले. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये एरिया डॉमिनन्स पेट्रोलिंगदरम्यान, हा स्फोट झाला. पाकिस्तानातील जिहादी दहशतवादी संघटना टीआरएफने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे.


या स्फोटाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हवेली तालुक्यातील सलोत्री गावामध्ये व्हिक्टर पोस्टजवळ भारतीय लष्करातील जाट रेजिमेंटचे नायब सुभेदार हरि राम, हवालदार गजेंद्र सिंह आणि अग्निवीर ललित कुमार हे आघाडीच्या चौक्यांजवळून गस्त घालत असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.


या स्फोटात ललित कुमार यांना वीरमरण आले. तर हवालदार गजेंद्र सिंह आणि सुभेदार हरिराम हे गंभीर जखणी झाले आहेत. जखमी जवानांना एअरलिफ्ट करून उपचारांसाठी उधमपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, व्हाइट नाईट कोअरने हुतात्मा जवानाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Comments
Add Comment

यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस

Mohsin Naqvi On Asia Trophy Ind vs Pak : अखेर BCCI समोर झुकला नक्वी! ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या नक्कावींचा माज उतरला, नक्की काय म्हणाला मोहसीन नक्वी?

दुबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी अखेर बीसीसीआय (BCCI)

PM Modi RSS 100th Year : भारतीय मुद्रेवर 'भारत मातेचे' चित्र; RSS शताब्दीनिमित्त मोदींनी उलगडले विशेष नाणे-तिकिटाचे रहस्य! काय म्हणाले PM मोदी?

नवी दिल्ली : आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेच्या १०० व्या वर्धापन

आरएसएसच्या शताब्दी वर्षांत देशभर कार्यक्रमांचे आयोजन

संघ विचाराच्या प्रसारासाठी स्वयंसेवक घरोघरी जाणार मोहन भागवत परदेशातही जाणार माजी राष्ट्रपती रामनाथ

अमेरिकेत १ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी राजीनामे देणार ?

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाने नाराजीचा स्फोट नवी दिल्ली : अमेरिकेत ३० सप्टेंबर रोजी तब्बल १ लाख

आजपासून बदलले 'हे' मोठे नियम! एलपीजी दरात वाढ, रेल्वे तिकीट बुकिंगसह अनेक नियमांत बदल

मुंबई: आज, १ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वपूर्ण नियम लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य