हिमालयाच्या कुशीतील धरणांना पुराचा धोका

  44

नवी दिल्ली: हवामान बदलाचे गंभीर परिणाम देशाच्या सुरक्षेवर व पायाभूत सुविधांवर दिसू लागले आहेत. हिमनद्या वितळत असून त्यातून तयार होणाऱ्या तलावांमुळे पूर येण्याचा धोका वाढला आहे.


हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ६ राज्यांमधील १०० हून अधिक धरणांवर हिमनदी सरोवरांच्या विध्वंसक पुराचा धोका निर्माण झाला आहे.


या गंभीर धोक्याची दखल घेत केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय जल आयोगाने तातडीने पावले उचलली असून, या धरणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. इतकेच नव्हे, तर या सरोवरांवर प्रत्यक्ष वेळेत नजर ठेवण्यासाठी संरक्षण दलांची मदत घेण्याचीही तयारी सुरू केली आहे.


केंद्रीय जल आयोगाने जारी केलेली ही सूचना उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतील धरणांना लागू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला