हिमालयाच्या कुशीतील धरणांना पुराचा धोका

नवी दिल्ली: हवामान बदलाचे गंभीर परिणाम देशाच्या सुरक्षेवर व पायाभूत सुविधांवर दिसू लागले आहेत. हिमनद्या वितळत असून त्यातून तयार होणाऱ्या तलावांमुळे पूर येण्याचा धोका वाढला आहे.


हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ६ राज्यांमधील १०० हून अधिक धरणांवर हिमनदी सरोवरांच्या विध्वंसक पुराचा धोका निर्माण झाला आहे.


या गंभीर धोक्याची दखल घेत केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय जल आयोगाने तातडीने पावले उचलली असून, या धरणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. इतकेच नव्हे, तर या सरोवरांवर प्रत्यक्ष वेळेत नजर ठेवण्यासाठी संरक्षण दलांची मदत घेण्याचीही तयारी सुरू केली आहे.


केंद्रीय जल आयोगाने जारी केलेली ही सूचना उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतील धरणांना लागू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या