हिमालयाच्या कुशीतील धरणांना पुराचा धोका

नवी दिल्ली: हवामान बदलाचे गंभीर परिणाम देशाच्या सुरक्षेवर व पायाभूत सुविधांवर दिसू लागले आहेत. हिमनद्या वितळत असून त्यातून तयार होणाऱ्या तलावांमुळे पूर येण्याचा धोका वाढला आहे.


हिमालयाच्या कुशीत वसलेल्या ६ राज्यांमधील १०० हून अधिक धरणांवर हिमनदी सरोवरांच्या विध्वंसक पुराचा धोका निर्माण झाला आहे.


या गंभीर धोक्याची दखल घेत केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय जल आयोगाने तातडीने पावले उचलली असून, या धरणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. इतकेच नव्हे, तर या सरोवरांवर प्रत्यक्ष वेळेत नजर ठेवण्यासाठी संरक्षण दलांची मदत घेण्याचीही तयारी सुरू केली आहे.


केंद्रीय जल आयोगाने जारी केलेली ही सूचना उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांतील धरणांना लागू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे