Kolhapur Accident: महाविद्यालयीन मुलींच्या घोळक्यात घुसली कार, एकीचा मृत्यू तर ३ गंभीर जखमी

कोल्हापुर: कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भरधाव चारचाकीनं महाविद्यालयीन विद्यार्थीनींना धडक दिल्याची घटना समोर आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कुरुकली भोगावती कॉलेजच्या रिक्वेस्ट बस स्टँड इथं ही घटना घडली आहे. या चारचाकीच्या धडकेत एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. तर 3 विद्यार्थीनी गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रज्ञा दशरथ कांबळे ( वय १८) असं मृत्यू झालेल्या कौलवं येथील विद्यार्थीनीचं नाव आहे. तर जखमी झालेल्या तरुणींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



नेमकं काय घडलं?


कॉलेज संपल्यानंतर बस स्टँडवर उभारलेल्या मुलींच्या घोळक्यात भरधाव कार घुसल्यानं हा अपघात झाला. दरम्यान, या घटनेनंतर कारचालकासह दोघा अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळासह सीपीआर रुग्णालयासमोर नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.


दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चालकाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. नेमका हा प्रकार घडला कसा याचीही पोलिस चौकशी करत आहेत. या अपघातात जखमी झालेल्या मुलींवर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी