गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या, अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी


नवी दिल्ली : येत्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सुविधा वाढवतानाच काही गाड्यांचे थांबेही वाढवावेत. जेणेकरून चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचणे सहज सुलभ होईल. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या चालवतानाच रेल्वे सेवांमध्ये तातडीने आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. स्लीपर आणि जनरल डब्यांचे अतिरिक्त कोच वाढवा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.


यावेळी गणेशोत्सवात विशेष गाड्या सोडतानाच अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वे प्रशासनाला तत्काळ सूचना देत असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी संगितले.
गणेशोत्सवातील रेल्वेसेवेबाबत लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.


नारायण राणे यांनी भेट घेत चर्चा केली आणि निवेदनही सादर केले. कोकणातील गणेश चतुर्थी उत्सव म्हणजे मोठा सण. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून असणारे कोकणवासी या उत्सवात आपल्या गावच्या घरी परततात.


यावेळी उपलब्ध असणारी सर्व वाहतूक अपुरी पडते. २७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या गणेश चतुर्थी उत्सवात कोकणात पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते व रेल्वे आरक्षण मिळवण्यात अडचणी येतात.


भारतीय रेल्वेने ऐतिहासिकदृष्ट्या या उत्सवादरम्यान विशेष गाड्या चालवल्या आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी ३४२ विशेष गाड्या चालवल्या आहेत. हे अतिशय स्वागतार्ह पाऊल होते आणि कोकणात प्रवास करणाऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला. यावर्षी यापेक्षाही जास्त गाड्यांचे नियोजन व्हावे अशी मागणी यावेळी खा. नारायण राणे यांनी केली आहे.




अनेक मुद्द्यांकडे निवेदनातून वेधले लक्ष


रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खा. राणे यांनी अनेक मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. मुंबई आणि पुणेसारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणाऱ्या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवा.


या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करण्याची खात्री करा, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आधीच नियोजन करता येईल आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि गैरसोय टाळता येईल.


प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी काही विशेष गाड्यांचे मार्ग थांबे वाढवा. पुरेशा आणि कार्यक्षम रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवासातील अडचणी कमी होतील आणि उत्सवाचा आनंदही वाढेल असे रेल्वेमंत्र्यांकडे त्यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी सर्व सेवा सकारात्मक पुरविण्याचे अभिवचन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू

Defence Minister Rajnath Singh : “पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही”; सिंधू जल करारावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक इशारा

हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या

Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

Indore Bus Accident : इंदौर : केंद्रीय संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह  (Rajnath Singh) यांचे भाचे प्रभात सिंह (Prabhat Singh) यांचा मध्य

ED Raid On TMC MLA Madan Mitra House : टीएमसी आमदार मदन मित्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरतीतील कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात ईडीने एक मोठी शोधमोहीम सुरू

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये मोठी दुर्घटना! भारतीय वायुदलाचे AN-32 ट्रान्सपोर्ट विमान कोसळले, जोरहाट एअरबेसवर आग

आसाम : आसाममधील जोरहाट येथे शनिवारी सकाळी भारतीय वायुदलाच्या (IAF) AN-32 ट्रान्सपोर्ट विमानाचा भीषण अपघात (Indian Air Force AN-32 Plane

Crime News : MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; तेलंगणातील महाठगाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची