गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या, अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी


नवी दिल्ली : येत्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सुविधा वाढवतानाच काही गाड्यांचे थांबेही वाढवावेत. जेणेकरून चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचणे सहज सुलभ होईल. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या चालवतानाच रेल्वे सेवांमध्ये तातडीने आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. स्लीपर आणि जनरल डब्यांचे अतिरिक्त कोच वाढवा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.


यावेळी गणेशोत्सवात विशेष गाड्या सोडतानाच अधिकच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वे प्रशासनाला तत्काळ सूचना देत असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी संगितले.
गणेशोत्सवातील रेल्वेसेवेबाबत लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.


नारायण राणे यांनी भेट घेत चर्चा केली आणि निवेदनही सादर केले. कोकणातील गणेश चतुर्थी उत्सव म्हणजे मोठा सण. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून असणारे कोकणवासी या उत्सवात आपल्या गावच्या घरी परततात.


यावेळी उपलब्ध असणारी सर्व वाहतूक अपुरी पडते. २७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या गणेश चतुर्थी उत्सवात कोकणात पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते व रेल्वे आरक्षण मिळवण्यात अडचणी येतात.


भारतीय रेल्वेने ऐतिहासिकदृष्ट्या या उत्सवादरम्यान विशेष गाड्या चालवल्या आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी ३४२ विशेष गाड्या चालवल्या आहेत. हे अतिशय स्वागतार्ह पाऊल होते आणि कोकणात प्रवास करणाऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला. यावर्षी यापेक्षाही जास्त गाड्यांचे नियोजन व्हावे अशी मागणी यावेळी खा. नारायण राणे यांनी केली आहे.




अनेक मुद्द्यांकडे निवेदनातून वेधले लक्ष


रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खा. राणे यांनी अनेक मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. मुंबई आणि पुणेसारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणाऱ्या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवा.


या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करण्याची खात्री करा, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आधीच नियोजन करता येईल आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि गैरसोय टाळता येईल.


प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी काही विशेष गाड्यांचे मार्ग थांबे वाढवा. पुरेशा आणि कार्यक्षम रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवासातील अडचणी कमी होतील आणि उत्सवाचा आनंदही वाढेल असे रेल्वेमंत्र्यांकडे त्यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी सर्व सेवा सकारात्मक पुरविण्याचे अभिवचन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन