मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये सुमारे ८७ टक्के पाणीसाठा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक सामगर तलावापाठोपाठ तानसा तलावही भरून ओसंडून वाहू लागला. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनियंनो हा तलाय ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्पाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे सलग पाचव्या वर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच तानसा तलाव भरण्याची किमया साथली गेली आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानस्खा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा आणि भातसा धरणामधून दिवसाला सुमारे ४ हजार दशलक्ष लिटर अर्थात ४०० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा होतो.
वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४० हजार दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४४ हजार कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे, या सर्व धरणांमध्ये बुधवारी १२ लाख ५७हजार ४४२ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ८६, ८८ टक्के इतका जलसाठा आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणान्या या तलावांपैकी 'हिंदुहृदयसखाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे ३ दरवाजे ७ जुलै २०१५ रोजी उघडण्यात आले. तर, ९ जुलै २०२५ रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ बुधवारी तानसा तलाव देखेल ओसंडून वाहू लागला, मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली.
बुधवारी ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४ हजार ५०८ कोटी लिटर (१४५,०८० दशलक्ष लिटर) एकही झाली आहे.
तानसा तलाव कोणत्या वर्षी, कधी भरले
२३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.४० वाजता सन
सन २४ जुलै २०१४ रोजी पहाटे ४.१६ वाजता
रान २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता
सन १४ जुलै २०२२ रोजी रात्री ८.५० वाजता
सन २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता
सन २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता