'तू मराठीत बोलू नको ', अशी धमकी देत परप्रांतीय युवकांकडून कॉलेज तरुणाला मारहाण

नवी मुंबई : राज्यात मराठी-हिंदी वाद सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत मनसे आक्रमक झाल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटत आहेत .


मराठी बोलण्याचा वाद आता कॉलेज मधील तरुणांपर्यंत जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. वाशीतील कॉलेजबाहेर मराठी बोलण्यावरून परप्रांतीय तरुणांनी सूरज पवारला मारहाण केली.


सूरज पवार मराठीत बोलत असल्याने तू मराठी बोलू नको असा दम फैजन नाईक याने दिला . त्यानंतर, दोघांमधील वाद वाढल्याने फैजन नाईक याने फोन करून आपल्या इतर तीन मित्रांना कॉलेजच्या बाहेर बोलवले. फैजन आणि त्याच्या मित्रांनी सूरज पवार याला हॅाकी स्टिकने मारहाण केली. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली . जखमी सूरजवर जवळील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.


दरम्यान, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आरोपी फैजान नाईक आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत करणे किंवा गंभीर दुखापत करणे), ३५२ (शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे), ३५१(२) आणि ३५१(३) (गुन्हेगारी धमकी ), कलम ३(५) (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत